शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

विधी व न्याय विभागाने धाडले न्यायालयाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 1:11 AM

राकेश पाटील हत्या प्रकरण : विशेष सरकारी वकील नेमण्याची केली हाेती मागणी

अंबरनाथ : मनसेचे उपशहरप्रमुख राकेश पाटील यांंच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी राकेश पाटील यांच्या भावाने केली होती. या प्रकरणी विधी व न्याय विभागाने या पत्राच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयाकडे पाठविले आहे.डी. मोहन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जैनम रेसिडेन्सी परिसरात राकेश पाटील यांंची २८ ऑक्टोबर रोजी हत्या केली होती. या हत्येनंतर काही आरोपी लागलीच पकडले गेले. 

मात्र, डी. मोहन आणि त्याच्यासोबतचे आणखी दोन आरोपी फरार झाले होते. त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आली. या हत्येतील सर्व मारेकरी अटकेत असून त्यांना न्यायालयाने योग्य शासन द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. १३ नोव्हेंबरला राकेश याचा भाऊ अजय पाटील याने राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पत्र देत या हत्या प्रकरणात आरोपींचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. संजय बी. मोरे या विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी केली.  या पत्राची दखल घेत शासनाने हे पत्र ठाणे जिल्हा न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीयांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील मिळणार किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान , शुक्रवारी आराेपींना न्यायालयात हजर केले तेव्हा संतप्त झालेल्या राकेशच्या कुटुुंबीयांनी आराेपींच्या दिशेने चप्पल भिरकावली हाेती.

टॅग्स :thaneठाणे