शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

उत्तन येथे कांदळवनात भूमाफियांचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 12:18 AM

महसूल विभाग, महापालिकेचे दुर्लक्ष

मीरा रोड : भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी नवीखाडी येथे मोठ्या प्रमाणात भराव करून भूमाफियांकडून बांधकामे केली जात आहेत. येथील कांदळवन नष्ट करून भराव-बांधकामे सुरूच आहेत. नव्याने भराव आणि मोठी कांदळवनाची झाडे मृत झाल्याचे आढळून आले आहे. भूमाफियांनी घातलेल्या हैदोसामुळे या भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारींकडे महापालिका, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक जागरूक नागरिकांनी केला आहे.

समुद्रकिनाऱ्यालगत असलेली उत्तनची नवीखाडी पालीपर्यंत विस्तारलेली आहे. या पात्र परिसरात दाट कांदळवन आहे; पण काही वर्षांत उत्तननाक्यापासून पालीपर्यंत या नवीखाडी पात्रात महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत. काहींनी मोठे बंगले बांधले आहेत, तर अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव आणि बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची मोठी कत्तल करण्यात आली असून याप्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही लोकांवर गुन्हेही दाखल केले होते.

खाडीपात्र आणि कांदळवनात केलेला भराव-बांधकामांमुळे भरतीचे पाणी आतपर्यंत येणे बंद झाले आहे. कचरा, पण मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे खाडीत सोडले जाणारे सांडपाणी तुंबून राहत आहे. पावसाळ्यात तर नवीखाडी आणि पात्र परिसरातील या बेकायदा भराव-बांधकामांमुळे काही वर्षांपासून सतत पूरस्थिती निर्माणहोत आहे.

कमरेभर पाणी रस्त्यावर आणि आजूबाजूच्या घरांमध्ये साचल्याने जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. याविरोधात स्थानिक जागरूक नागरिकांनी सातत्याने तक्रारी करूनही महापालिका, महसूल विभागाचेसोयीस्कर दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप सुरू आहे.

याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तलाठी उत्तम शेडगे यांनी तक्रारीनंतर पाहणी करून वरिष्ठांना अहवाल दिल्याचे सांगितले. पण, पर्यावरणाच्या ºहासाबाबत आणि गुन्हा दाखल करण्याबाबत मात्र शेडगे यांनी बोलणे टाळले.

कांदळवनाची झाडे तोडली आणि भराव केला, त्याबाबत मीच तलाठी यांना तक्रार करून पंचनामा करायला लावले. तलाठी कारवाई करत नसेल तर तहसीलदारांकडे तक्रार करू. भराव व बांधकामप्रकरणी माझ्यासह सहकारी नगरसेवक एलायस बांड्या आणि नगरसेविका हेलन जॉर्जी यांनी सतत महापालिका अतिक्रमण आणि आरोग्य विभागास तक्रारी करूनही ते कारवाई करत नाहीत.- शर्मिला गंडोली, नगरसेविका

संगनमताशिवाय अशक्य

महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत आणि आशीर्वाद असल्याशिवाय नवीखाडी पात्र आणि परिसरात कांदळवनाची कत्तल करून बेकायदा भराव-बांधकामे होणे शक्यच नाही, असा आरोप माजी नगरसेवक जोजफ घोन्सालवीस यांनी केला आहे. पालिकेचाही यात सहभाग आहे. या बांधकामांना वीज, पाणी आदी सुविधा मिळतात कशा? आमची गावे आणि पर्यावरण वाचवायचे असेल तर नवी खाडीपात्रातील भराव व बेकायदा बांधकामे तातडीने हटवायला हवीत, अशी मागणीही घोन्सालवीस यांनी केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे