शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

खंबाळपाडा मार्गाची खड्ड्यांनी झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या खंबाळपाडा मार्गावरही हेच चित्र असून, या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. २०१७ च्या पावसाळ्यात या मार्गावर सुरू असलेल्या गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यांत पडून एका व्यापाराचा मृत्यू झाला होता. सध्याचे खड्डे पाहता आणखी बळी गेल्यानंतर संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.

टाटानाका ते घरडा सर्कल हा खंबाळपाडा मार्ग केडीएमसीच्या हद्दीत येत असला तरी या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला केमिकल कंपन्या व बेकायदा थाटलेली मार्बलची दुकाने आहेत. या रस्त्यावर प्रदूषित पाण्याच्या प्रवाहाबरोबरच भोवताली पडलेल्या डेब्रिजच्या कचऱ्याने या मार्गाला अवकळा आली आहे. जलवाहिनीवर झालेली बेकायदा बांधकामे, याेग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी या मार्गावरील विकासनाका येथे तीन ते चार फुटांपर्यंत साचत होते. तेथे रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. त्याला लागून असलेल्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मध्यंतरी या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र, पावसाळा सुरू हाेताच पडलेल्या खड्ड्यांनी या कामाचा दर्जा दाखवून दिला आहे.

विकासनाका, भोईरवाडी, सावित्रीबाई फुले कला मंदिरनजीकचा चौक या महत्त्वाच्या ठिकाणांसह या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. माेठमाेठे खड्डे असल्याने या मार्गावरून वाहन चालविणे चालकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करू

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. ते काम निकृष्ट झाल्याचे आता पडलेल्या खड्ड्यांनी उघड केले आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊनच तेथून मार्गस्थ व्हावे लागते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. वेळीच हे खड्डे न बुजवल्यास यंत्रणेच्या निषेधार्थ खड्ड्यांत साठलेल्या पाण्याने आंघोळ करू, असे मत रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

---------------