शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आधी स्वच्छतागृहे सुधारा

By admin | Updated: February 20, 2017 05:46 IST

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. पालिकेच्या या धोरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. उघड्यावर बसणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईची सूचना केली आहे. गरीब नागरिकांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे आणि ज्या स्वच्छतागृहात पाणीच नाही, त्या ठिकाणी नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसत असतील, तर त्याला केवळ पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी पालिकेने नव्याने स्वच्छतागृह बांधले. अनेक नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून दिली. मात्र, असे असतानाही काही भागांतील स्वच्छतागृहांची दुरुस्तीच झालेली नाही. पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे नागरिकांना शक्य होत नाही. ज्या भागात एकमेव स्वच्छतागृह आहे आणि तेही सुस्थितीत नसेल, तर नागरिकांना नाइलाजाने उघड्यावर बसण्याची वेळ येते. नागरिकांची ही समस्या न सोडवता थेट उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. त्यात जे नागरिक पकडले गेले, ते अत्यंत गरीब घरातील असून १०० ते २०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. या नागरिकांना थेट पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. १०० रुपये दंड आकारला. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, अशांना किमान पोलिसांच्या स्वाधीन करू नका, अशी सूचना काँग्रेसच्या नगरसेवकांनी मांडली. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी या नागरिकांवर कारवाईची भीतीच निर्माण करायची असेल, तर वेळेवर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच करा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या घरच्यांनाही कल्पना दिली जात नाही. अशा परिस्थितीत कुटुंबामध्ये धास्ती निर्माण होते. जे उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळणे हे नैतिकतेला धरून नसल्याचे यावेळी सभागृहात स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)कामे पूर्ण न करताच बिलेच्दरम्यान, या विषयावर पालिका सभेत चर्चा सुरू असताना शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम केल्यावरही अनेक ठिकाणी ते काम पूर्ण न करताच बिले देण्यात आली, असा आरोपही करण्यात आला. च्अनेक स्वच्छतागृहांत रात्रीच्यावेळी दिवा, पाणी नसते. स्वच्छता, दरवाजेही नसतात. दरवाजांना कडी नसणे, अशी अवस्था आहे. यावरही पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या चर्चेत नगरसेवक उमेश पाटील, विलास जोशी, वृषाली पाटील, उमर इंजिनीअर, निखिल वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी सहभाग घेतला.