शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लोकलमधून प्रवासबंदी असताना अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 4:13 PM

कोरोना आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नव्हती का? जीआरपी, आरपीएफ पोलीस होते कुठे? 

ठळक मुद्देमयूर शेळके हा पॉइंट्समन जर तेथे नसता, प्रसंगावधान राखून त्याने त्या बालकाचा जीव वाचवला नसता तर होत्याचे नव्हते झाले असते याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असा सवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वांगणीचे रहिवासी मनोहर शेलार यांनी केला आहे

डोंबिवली : वांगणी रेल्वे स्थानकात अंध माता मुलासह गेली, आणि तेवढ्यात होणारा अपघात अनर्थ सुदैवाने आणि मयूर शेळके या पाँईंटमनच्या धाडसी कामगिरीने टळला. परंतु कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाचे निर्बंध असताना ते मायलेक स्थानकात गेले कसे काय? पोलीस यंत्रणा काय करत होती? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने केला आहे. 

मयूर शेळके हा पॉइंट्समन जर तेथे नसता, प्रसंगावधान राखून त्याने त्या बालकाचा जीव वाचवला नसता तर होत्याचे नव्हते झाले असते याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असा सवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वांगणीचे रहिवासी मनोहर शेलार यांनी केला आहे. शेळके यांचे कौतुक करायला हवेच, महासंघ, वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने ते केलेच. परंतु, दुसऱ्या मुद्याकडे लक्ष द्यायला हवे, की ते आत फलाटमध्ये आलेच कसे? त्यांना कोणी अडवले नाही का? आरपीएफ, जीआरपी पोलीस यंत्रणा काय करत होती? कार्यरत होती की नव्हती? असेल तर कोण होते, त्यावेळी ते फलाटात काय करत होते याची चौकशी, कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत शेलार यांनी व्यक्त केले. 

दरम्यान रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात शेळके यांच्यासारखे सतर्क कामगार असतीलच असे नाही, त्यामुळे धोरणात्मक कार्यपद्धतीनुसार या अपघाताचा केवळ सत्कार करण्यापर्यन्त आनंद व्यक्त न करता, हे नेमके घडलेच कसे यांच्या मुळापर्यत जायला हवे असेही मत त्यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :railwayरेल्वेthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या