शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्यांना लोकप्रतिनिधींचे अभय

By admin | Updated: August 18, 2015 00:29 IST

कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ६० चा बहुतांश भाग हा डोंगराळ असून या डोंगरावर वन खाते, मनपा आणि तथाकथित पुढारी, झोपडपट्टीदादा यांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या २० वर्षांत

दिवाकर गोळपकर, कोळसेवाडीकल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ६० चा बहुतांश भाग हा डोंगराळ असून या डोंगरावर वन खाते, मनपा आणि तथाकथित पुढारी, झोपडपट्टीदादा यांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या २० वर्षांत असंख्य झोपड्या बेकायदेशीररीत्या तत्कालीन नगरसेवक रमेश जाधव, जयश्री कुळकर्णी, राजेंद्र पाटील व प्रतिमा जाधव यांच्या साक्षीने बांधण्यात आल्या आहेत. अधूनमधून त्यावर लुटुपुटुच्या कारवाया झाल्या. परंतु, या वाढत्या झोपड्यांना आळा बसलेला नाही.एकेकाळी निसर्गसौंदर्याने नटलेली ही टेकडी भूमाफियांच्या झोपडपट्टीमुळे बकाल झाली आहे. मनपातर्फे झोपडपट्टीवासीयांच्या नागरी सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, सध्याची भागाभागांतील दुरवस्था पाहिल्यानंतर तो संपूर्ण निधी नियोजनशून्य कारभारामुळे वाया गेला असल्याचे मत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.भूमाफियांनी झोपड्या बांधताना डोंगर पोखरले, त्यामुळे दरडी मोकळ्या झाल्या. त्याच दरडी कोसळून गेल्या काही वर्षांत अनेक दुर्घटना झाल्या. पावसाळा आला की, येथील लोक जीव मुठीत धरून राहतात. महापालिकेच्या वतीने दरडग्रस्त भागातील लोकांना घरे खाली करण्याच्या पावसाळ्यात नोटिसा दिल्या जातात, पण लोक खाली करीत नाहीत, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.सिद्धार्थनगर, गणेशनगर, अजंठानगर, शिवशक्तीनगर, रामनगर, भीमनगर, आंबेडकरनगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर येथील वसाहतींमध्ये सर्व जातीधर्मांचे लोक नाइलाजास्तव अतिशय गलिच्छ वातावरणात राहत आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत टेकडीवर बांधलेल्या जलकुंभातून डोंबिवलीला पाणी पुरवले जाते, पण टेकडीवासीयांना मात्र पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्षे जमिनीत खोलवर असलेल्या पण जीर्ण झालेल्या गणेशनगर, आनंदनगरमधील जलवाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकल्या आहेत. बौद्धविहार टेकडी भागात पाणी चढविण्याकरिता संपपंप लावून पाणी पोहोचविण्यात आले आहे. परंतु, असंख्य ठिकाणी जोडण्यांमधून गळती आहे. जलवाहिन्या गटारांतून गेल्या आहेत. दूषित पाणी पिण्यामुळे रोगराई वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.घरदुरुस्ती करताना ज्यांच्या जागाजमिनी आहेत, त्यांना प्रचंड त्रास होत असल्याचे महिलांनी दु:ख मांडले. बहुतांशी झोपड्यांमध्ये संडास नाहीत, त्यांना निर्मल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचाच आधार आहे. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेने त्यांची अपुरी संख्या, त्यामुळे प्रचंड ताण पडतो. मात्र, शौचालयांच्या स्वच्छतेवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्या वाहत्या घाणीच्या नरकातच लोक राहतात. आनंदनगर, जयभवानीनगर व साईकृपा हॉटेलमागील परिसरात ही परिस्थिती आढळली.आनंदनगर, जयभवानीनगर, साईकृपा हॉटेल, देवीकृपा हॉटेलमागील परिसरात जुनी गटारे दुरुस्त करून नव्याने बांधण्यात आली आहेत. परंतु, चाळीचाळींमधील अंतर्गत गटारांची अवस्था अतिशय भयानक आहे. महात्मा फुलेनगर, गणेशनगर, अजंठानगर भागातील दुरवस्थेतील लाद्या काढून नवीन बसविल्या आहेत.सूचकनाका, रामनगर, सम्यक विद्यालय या मार्गावर ७ लक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ असलेल्या भागापासून कायम पाणी वाहत असते. अनेक ठिकाणी लिकेज असण्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे रस्त्याची अवस्था इतकी खडकाळ व खड्डेमय आहे की, दोन वेळा रस्त्यांचे डांबरीकरण करूनही वाया गेले आहे. भूमिगत जलवाहिन्यांचे लिकेज काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही मनपाने लक्ष न दिल्याचे नगरसेविका प्रतिमा जाधव यांनी सांगितले.या प्रभागात आरक्षण क्र. ४९२ वर प्राथमिक शाळेचा विस्तार, तर आरक्षण क्र. ५०६ वर बगिच्याचे उद्दिष्ट आहे, परंतु मनपाने या जागा ताब्यात न घेतल्याने प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.