शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

विकासकामांना हिरवा कंदील

By admin | Published: March 28, 2017 5:56 AM

सरकारच्या परिपत्रकामुळे रखडलेली १०७ कोटींची विकासकामे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्गी लागण्याची

उल्हासनगर : सरकारच्या परिपत्रकामुळे रखडलेली १०७ कोटींची विकासकामे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे. अर्थात, आयुक्तांनी हे विषय स्थायी समितीत सादर केले पाहिजे. यावर स्थायी समिती निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.महापालिका निवडणुका झाल्यानंतर स्थायी समिती व महासभेत धोरणात्मक निर्णय व आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेऊ नये, असे परिपत्रक सरकारने २८ फेब्रुवारीला काढले होते. या परिपत्रकाविरोधात स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपत असून तोपर्यंत अधिकार घेण्याचा निर्णय जुन्याच नगरसेवक व पदाधिकारी यांचा असल्याचे म्हटले आहे. सरकारचे परिपत्रक म्हणजे आमच्या अधिकारावर गदा येत असल्याचे मत सुर्वे यांनी व्यक्त केले.उच्च न्यायालयात सुर्वे यांची बाजू ऐकली. सुर्वे समितीची बैठक बोलवून निर्णय घेऊ शकतात. मात्र, विषय देण्याचे काम पालिका आयुक्तांचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आयुक्तांनी रखडलेल्या विकासकामाचे विषय दिले नाहीतर, न्यायालयासह सरकार व हरित लवादाचा हक्कभंग झाला, असे समजून न्यायालयाचे दरवाजे पुन्हा ठोठावू, असे सुर्वे म्हणाले. तर, आयुक्त सुधाकर शिंदे यांनी उच्च न्यायालयाचा आदेश वाचल्यानंतर नियमानुसार निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)स्थायीच्या बैठकीला नगरसेवक येणार का?महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ५ एप्रिलला होणार असून ३० मार्चला अर्ज भरायचे आहेत. महापौरपदासाठी भाजपा व शिवसेना आमनेसामने उभे ठाकले असून नगरसेवकांची पळवापळवी व फोडाफोडीची चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान, महापौर अपेक्षा पाटील यांनी जुन्या नगरसेवकांची सोमवारी पुन्हा महासभा बोलवली आहे. तर, सुर्वे यांनी बोलवलेल्या बैठकीत जुने नगरसेवक येणार का, असा प्रश्न उभा ठाकला आहे.