शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 1:00 AM

कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते.

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल, तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल, असे मत ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या ‘मौनाची स्पंदने’ या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी तिच्याच राहत्या घरी पार पडला. यावेळी आपले मनोगत मांडताना म्हात्रे म्हणाले की, कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा विचार करणे, स्वत:मधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे, ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत.

कवितालेखन करताना स्वत:ला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट. मात्र, ही किमया मानसीला उत्तम साधली आहे, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांनी या संग्रहातील ‘परतीच्या वाटेवर अजूनही’ ही कविता वाचून दाखवली. मानसी मनोगतात म्हणाली की, या संग्रहनिर्मितीचे सारे श्रेय माझ्या आईला देते. माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार आहे. व्यास क्रि एशन्सचे संचालक निलेश गायकवाड प्रास्ताविकेत म्हणाले, मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे.

तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे. यावेळी व्यास क्रि एशन्सचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी, बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी केले. या कार्यक्रमाला लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, रामदास खरे, मेधा सोमण, निवेदिका साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजुषा पाटील, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर व इतर उपस्थित होते. मानसीच्या ‘आकाश कवेत घेताना’ या आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत, असे गायकवाड यांनी शेवटी जाहीर केले. महापौर नरेश म्हस्के यांनी शेवटी मानसीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले, तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे