शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग; अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 11:16 IST

आगीतलाखोंचे नुकसान सुदैवाने जिवीतहानी टळली. शुक्रवारी रात्री लागली होती आग

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १६ ) भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून कशेळी येथे फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या आगीत फर्निचरचे गोदाम व कारखाने जळून खाक झाले आहेत. ही आग लाकडी फर्निचर असल्याने काही क्षणातच गोदाम , कारखाना ,लगतच्या दुकानांध्ये पसरली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिवंडी , ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्याने शनिवारी पहाटे ही आग आटोक्यात आली आहे.

विशेष म्हणजे या आगीचे नेमकी कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्किटने ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर शुक्रवारी दसरा निमित्त कामगारांना सुट्टी असल्याने जिवीत हानी टळली आहे. मात्र या आगीत लाखोंचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भिवंडी - ठाणे मार्गावर असलेल्या कशेळी टोल नाक्या नजीकच महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे. या फॅमिचर कारखान्यात रात्रीच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली . तर आग एवढी भीषण आहे की, या आगीचे लोट सर्वत्र पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दल व स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विशेष म्हणजे काही लगतचे दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी शनिवारी सकाळी या आगीवर पूर्णनियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या यश आले आहे. 

महत्वाचे म्हणजे भिवंडीत गोदामांमध्ये आगी लागण्याचे सत्र नेहमीच घडत असते मात्र या आगिंचे कारण नेहमीच गुलदस्त्यात असते, वारंवार लागणाऱ्या या आगी नेमकी कशामुळे लागतात याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा नेहमीच अपयशी ठरतांना दिसत आहे. विशेष म्हणजे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने नारपोली पोलीसठाण्याकडून आजपर्यंत एकही गोदामांच्या आगीच्या खऱ्या कारणांची माहिती पोलोसांनी आजपर्यंत दिलेली नाही. त्यातच दिवाळी सण,  डिसेंबर व मार्च महिन्याच्या शेवटी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगी लगण्याचे सत्र वारंवार घडतात त्यामुळे या आगी इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावण्यात येत असाव्यात असा संशय वारंवार व्यक्त करण्यात येतो मात्र संशय व्यक्त केल्या नंतरही या आगिंचे खरे कारण आजपर्यंत समोर आलेले नाही. 

टॅग्स :fireआग