शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 4:59 PM

बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांचे शिक्षण मंत्र्यांना ट्विट, गोंधळाचा त्रास विद्यार्थ्यांना का?

डोंबिवली: पत्रीपूलावरून सत्ताधारी, प्रशासन यांच्यातआरोप प्रत्यारोप सुरु असतांनाच आता त्या ठिकाणी होणा-या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांची शाळा अनाठायी बुडत आहे. शाळेत जायला उशिर झाल्याने शाळा प्रशासन देखील विद्यार्थ्यांना शाळेत घेत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. डोंबिवली एमआयडीसी मधील रहिवासी बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांच्या पाल्यांना तसा अनुभव आल्याने त्रस्त पालकांनी थेट शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना ट्विट लिहून गा-हाणे मांडले आहे.

गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा कलयाणला शाळेत जायला सकाळी ७ वाजता घरातून निघाला, त्याला पत्रीपूलावर कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्याला शाळेत जायला काहीसा उशिर झाला. शाळा सकाली ८ वाजून १० मिनिटांची असते, म्हणजे त्याला घरातून शाळेत जायला १ तासाहून अधिक वेळ लागला. त्यात त्या मुलांची चूक काय आहे? जर पत्रीपूलाचे काम वेळेत झाले, तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत झाली तर ही समस्या भेडसावणार नाही. त्यासाठी त्यांनी शेलार यांना ट्विट केले, तसेच पत्र लिहिल्याचे पाटे म्हणाले. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी शाळा प्रशासनाचीही भेट घेत कोंडीच्या कारणाने काही लेट झाल तर मुलांना सूट द्यावी अशी विनंती केली, शाळा व्यवस्थापनानेही अडचण समजून घेतली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु विद्यार्थ्यांनी अजून किती लवकर निघावे आणि शाळेत जावे? वाहतूक कोंडीत अडकल्याने मुलांच्या मानसीकतेवर परिणाम होतो, याचीही शिक्षणमंत्र्यांसह संबंधितांनी नोंद घ्यावी.

आमदार नरेंद्र पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रीपूलाचे काम लष्कराकडे द्यावे अशी लेखी मागणी केली आहे, त्यामुळे तेथे समस्या भेडसावत आहेत हे वास्तव असल्याचे गांभिर्य ओळखून तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा डॉ. पाटे यांनी व्यक्त केली. १० किमी अंतर कापण्यासाठी एवढा वेळ लागत आहे, हे योग्य नाही. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे शाळांचे काटेकोर नियम या कचाट्यात विद्यार्थी सापडले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे चांगले नियोजन करून अरुंद पूलावरुन वाहतूक सुटसुटीत करण्यासाठी निदान आगामी काळात गांभीर्याने लक्ष घातल्यास विद्यार्थ्यांची शाळा अनाठायी बुडणार नाही. त्यामुळे पालकांना, पाल्यांना आणि शाळेलाही दिलासा मिळेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSchoolशाळाStudentविद्यार्थीAshish Shelarआशीष शेलार