शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

सोशल मीडिया आणि संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 23:46 IST

ठाणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये १,०४३ तक्रारी

- जितेंद्र कालेकरठाणे :  सोशल मीडियावर पती-पत्नीचे असलेले लक्ष आणि एकमेकांच्या चारित्र्यावरील संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण लागल्याच्या अनेक तक्रारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलमध्ये येत आहेत. गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या कारणांच्या एक हजार ४६१ तक्रारी या कक्षाकडे आल्या. त्यातील ५०१ तक्रारींवर या पथकाने समझोता घडवून आणला आहे.लग्नातील मानपानावरून होणारी भांडणे, सासू, सासरे, पती, दीर, नणंद यांच्याकडून माहेरून पैसे आणण्यासाठी होणारा त्रास, पतीचे परस्त्रीबरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारूचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, यातूनच पती-पत्नींमध्ये सतत वाद होतात. या तक्रारी घेऊन महिला पोलीस ठाण्यात येतात. तर, पती व्यसनी आहे अथवा त्याचे परस्त्रीशी ‘संबंध’ आहेत. तो तिकडे खर्च करेल, या भीतीने त्याचा पगारच काही महिला काढून घेतात. अशी प्रकरणे पोलिसात गेल्यानंतर सुरुवातीला साधी अदखलपात्र तक्रार दाखल होते. नंतर आयुक्तालयातील ‘भरोसा’ सेलमध्ये सामाजिक संस्थांद्वारे अशा दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणला जातो. जिथे समेट घडवून येत नाही, अशा प्रकरणांमध्ये त्यांना पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठविले जाते. नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेचारित्र्यावर संशय घेण्यातून अनेक दाम्पत्यांचे वाद विकोपाला जातात. अनेक घरांमध्ये सासू (पतीची आई) पती-पत्नींमध्ये हस्तक्षेप करतात, तर काही ठिकाणी मुलींची आई या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पत्नीची वेशभूषा व पतीचे व्यसन हाही कळीचा मुद्दा आहे. पत्नीकडूनही छळवणुकीचे प्रकार वाढले, अशी सुमारे ३० टक्के प्रकरणे असल्याची माहिती ‘कॉज फाउंडेशन’च्या कल्पना मोरे यांनी दिली.५०१ प्रकरणांत समेटपती-पत्नींमधील वादाबरोबर बऱ्याच प्रकरणांमध्ये सासू-सुनेचे पटत नाही. एकत्र कुटुंबातून वेगळे व्हायचे असते. अशावेळी दोन्ही बाजूंनी समझोता घडवून आणला जातो. २०१९ मध्ये अशा १,०४३ तक्रारी आल्या. ४३६ प्रकरणांमध्ये समझोता केला. तर २०२० नोव्हेंरपर्यंत ४१८ तक्रारींपैकी ६५ प्रकरणांमध्ये समझोता केल्याचे भरोसा सेलचे सुनील कांबळे म्हणाले.सामाजिक संस्थांच्या मदतीने  पती-पत्नींचे समुपदेशन केले जाते. त्यांच्यात समझोता घडवण्याचा प्रयत्न केला जातो. जर एखाद्या महिलेचा अति छळ किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत असेल किंवा तिच्या जीवाला धोका असेल, मारहाण होत असेल अशा वेळी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी प्रकरण पाठविले जाते.       - पूनम चव्हाण, भरोसा सेलप्रमुख, ठाणे