शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सोशल मीडिया आणि संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 23:46 IST

ठाणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये १,०४३ तक्रारी

- जितेंद्र कालेकरठाणे :  सोशल मीडियावर पती-पत्नीचे असलेले लक्ष आणि एकमेकांच्या चारित्र्यावरील संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण लागल्याच्या अनेक तक्रारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलमध्ये येत आहेत. गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या कारणांच्या एक हजार ४६१ तक्रारी या कक्षाकडे आल्या. त्यातील ५०१ तक्रारींवर या पथकाने समझोता घडवून आणला आहे.लग्नातील मानपानावरून होणारी भांडणे, सासू, सासरे, पती, दीर, नणंद यांच्याकडून माहेरून पैसे आणण्यासाठी होणारा त्रास, पतीचे परस्त्रीबरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारूचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, यातूनच पती-पत्नींमध्ये सतत वाद होतात. या तक्रारी घेऊन महिला पोलीस ठाण्यात येतात. तर, पती व्यसनी आहे अथवा त्याचे परस्त्रीशी ‘संबंध’ आहेत. तो तिकडे खर्च करेल, या भीतीने त्याचा पगारच काही महिला काढून घेतात. अशी प्रकरणे पोलिसात गेल्यानंतर सुरुवातीला साधी अदखलपात्र तक्रार दाखल होते. नंतर आयुक्तालयातील ‘भरोसा’ सेलमध्ये सामाजिक संस्थांद्वारे अशा दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणला जातो. जिथे समेट घडवून येत नाही, अशा प्रकरणांमध्ये त्यांना पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठविले जाते. नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेचारित्र्यावर संशय घेण्यातून अनेक दाम्पत्यांचे वाद विकोपाला जातात. अनेक घरांमध्ये सासू (पतीची आई) पती-पत्नींमध्ये हस्तक्षेप करतात, तर काही ठिकाणी मुलींची आई या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पत्नीची वेशभूषा व पतीचे व्यसन हाही कळीचा मुद्दा आहे. पत्नीकडूनही छळवणुकीचे प्रकार वाढले, अशी सुमारे ३० टक्के प्रकरणे असल्याची माहिती ‘कॉज फाउंडेशन’च्या कल्पना मोरे यांनी दिली.५०१ प्रकरणांत समेटपती-पत्नींमधील वादाबरोबर बऱ्याच प्रकरणांमध्ये सासू-सुनेचे पटत नाही. एकत्र कुटुंबातून वेगळे व्हायचे असते. अशावेळी दोन्ही बाजूंनी समझोता घडवून आणला जातो. २०१९ मध्ये अशा १,०४३ तक्रारी आल्या. ४३६ प्रकरणांमध्ये समझोता केला. तर २०२० नोव्हेंरपर्यंत ४१८ तक्रारींपैकी ६५ प्रकरणांमध्ये समझोता केल्याचे भरोसा सेलचे सुनील कांबळे म्हणाले.सामाजिक संस्थांच्या मदतीने  पती-पत्नींचे समुपदेशन केले जाते. त्यांच्यात समझोता घडवण्याचा प्रयत्न केला जातो. जर एखाद्या महिलेचा अति छळ किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत असेल किंवा तिच्या जीवाला धोका असेल, मारहाण होत असेल अशा वेळी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी प्रकरण पाठविले जाते.       - पूनम चव्हाण, भरोसा सेलप्रमुख, ठाणे