शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील पाणीही आता पिण्यासाठी

By admin | Updated: October 13, 2016 03:45 IST

शहराला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना अधिक प्रमाणात करावा लागला नसला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी

ठाणे : शहराला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना अधिक प्रमाणात करावा लागला नसला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी वापरात आणण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात अस्तित्वात असलेल्या विहिरींची सफाई करून त्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, जलशुद्धीकरणाची ही प्रक्रिया बीओटी तत्त्वावर राबवली जाणार असून शुद्ध केलेले पाणी महापालिका संबंधित यंत्रणेकडून विकत घेणार आहे. ठाणे शहराला आजघडीला रोज सुमारे ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ते मुबलक असतानादेखील मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शहरात पाणीकपात सुरू होती. परंतु, त्याची झळ ठाणेकरांना फारशी सहन करावी लागलेली नाही. असे असले तरी आता उपलब्ध जलस्रोतांकडे पालिकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, शहरात असलेल्या आणि दूषित झालेल्या विहिरींची शोधमोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्यानुसार, शहराच्या विविध भागांत ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली. परंतु, यातील काही विहिरी पडीक, वापरात नसणे, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, तर काही कोरड्या पडल्या होत्या. काहींमध्ये गटारांचे पाणी गेल्याने ४० टक्के भूगर्भजलातील पाणीसाठा अशा विविध कारणांमुळे दूषित झाल्याची माहितीही या सर्व्हेत पुढे आली होती. त्यामुळे वापरात नसलेल्या विहिरींची संख्या २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ३३९ वर आली आहे. या विहिरींतील पाण्याच्या साठ्याचे मोजमाप ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी वापरास व पिण्यास अयोग्य असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत, त्यातील पाणी उपयोगात आणण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, पालिकेने यंदा या विहिरींतील गाळ काढण्याचे काम सुरू करून सुमारे १३० विहिरी स्वच्छ केल्या आहेत.

घोडबंदर, मुंब्रा आणि दिव्याची पाणी वितरण व्यवस्था आणि मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम पालिकेने तत्कालीन केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी या दोन्ही योजनांचा ६५० कोटींचा एकत्रित प्रकल्प अहवाल केंद्राकडे सादर केला होता. मात्र, एवढा निधी देता येत नसल्याचे कारण केंद्राने पुढे केले होते. त्यानंतर, आलेल्या भाजपा सरकारने जेएनएनयूआरएम ही योजनाच बंद केल्याने पालिकेने अहवाल बासनात गुंडाळला होता. परंतु, आता पुन्हा यात काही किरकोळ फेरबदल करून तो तयार केला असून या दोन्ही कामांसाठी सुमारे तेवढाच निधी खर्र्च केला जाणार आहे.सध्या घोडबंदरला ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. परंतु, येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यानुसार, महापालिकेने येथील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचे ठरवले आहे. पाणी वितरण व्यवस्थेच्या कामात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे, पंपहाउस, पंपिंग मशिनरी, बल्क मीटर बसवणे, आॅटोमेशन आणि स्काडा प्रणाली, स्टाफ क्वॉटर बांधणे, गळती संशोधनाकरिता उपकरणे खरेदी करणे, नळजोडण्या अशी कामे केली जाणार आहेत.