शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

"भाजपातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना दोन वर्षे पदे देऊ नका; पवारांच्या त्यागाची किंमत समजलीच पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 06:54 IST

पक्ष म्हणजे खाणावळ नव्हे, पवारांच्या त्यागाची किंमत समजलीच पाहिजे

अंबरनाथ : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही. प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खानावळ नाही, असे खडेबोल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे काही क्षणातच पडले.

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना वेटिंगमध्ये राहण्याचा सल्ला आव्हाड यांनी दिला, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना इडीने पाठवलेली नोटीस आणि साताऱ्यातील भर पावसातील प्रचारसभा यामुळे गेम चेंज झाला आणि राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलीच चपराक बसली. 

या घटनांमुळे राष्ट्रवादीने दमदार उभारी घेत ५५ आमदार विजयी झाले. केंद्र सरकारची शेती आणि कामगार विरोधी धोरणे चिंताजनक असल्याचे सांगून सुळे यांनी मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद संसदेतून निवृत्त होणार म्हणून पंतप्रधानांना सभागृहात अश्रू अनावर झाले, मात्र नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत, असा टोला सुळे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीत भाजपला कात्रजचा घाट दाखविण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून, आता नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, असा दावा प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी केला. यावेळी प्रमोद हिंदुराव, महेश तपासे, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे , विद्या वेखंडे, आयोजक सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसambernathअंबरनाथ