शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मुंब्रा बायफास दुरुस्तीदरम्यान टोल बंद करा, अन्यथा कायदा हातात घेऊ - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 2:18 PM

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

ठाणे-  मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंयत ऐरोली आणि मुंबईला जाणार टोल बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. टोल बंद न केल्यास कायदा हातामध्ये घेऊन स्वतः टोल बंद करण्याचा इशारादेखील आव्हाड यांनी दिला आहे. दोन वर्षांपूर्वी मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पाठपुरावा करूनही शासनाने या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असून शहरातील वाहतूक समस्येकडे शासन आणि ठाण्यातील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आव्हाड यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. 

मंगळवारपासून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे होणारा वाहतूक कोंडीचा फटका मात्र ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहनचालकांना होत आहे. दोन महिने हे दुरुस्तीचे काम सुरु राहणार असल्याने दोन महिने आता ठाणेकरांना तसेच नवी मुंबईच्या वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. बायपासच्या दुरुस्तीच्या कामावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनावर तसेच ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली असून पालकमंत्र्यांनी केवळ पालकत्व संभाळण्यापलीकडे दुसरे काही केले नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे शासनाने तसेच सत्ताधाऱ्यांनी नेहमीची दुर्लक्ष केले असल्याचे म्हणाले. मुंब्रा बायपास धोकायदाक झाला असल्याचे यापूर्वीच आयआयटीचा अहवाल होता.

मी देखील दोन वर्षांपासून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच कोपरी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती बरोबरच विटावा ते कोपरी पुलासाठी तसेच भिवंडी बायपाससाठीदेखील पाठपुरावा केला होता. मात्र या शासनाने या महत्त्वाच्या गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. साकेत आणि रुस्तमजीच्या बाजूने सर्व्हिस ब्रिज बांधण्याचीदेखील आपली मागणी आहे . 

मंगळवारपासून सुरु झालेल्या मुंब्रा बायपासमुळे दोन महिने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याने या दुरुस्तीच्या कालावधीत ऐरोली तसेच मुंबईकडे जाणारा टोल बंद करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे . तसे न केल्यास सोमवार पासून स्वतः टोल नाके बंद करून असा इशारा आव्हाड यांनी शासनाला दिला आहे . 

एकच टोल भरण्याची  घोषणा हवेतच - 

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कालाधित वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी एकच टोल भरण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरु होण्यापूर्वी केली होती . त्यामुळे वाहन चालकांना एक तर ऐरोली किंवा मुलुंडचा असा एकच टोल भरावा लागणार होता . मात्र पालकमंत्र्यांच्या या घोषणेची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली असून दोन्हीकडे वाहन चालकांना टोल भरावा लागत आहे . आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोल बंद करण्याची मागणी केली असल्याने टोल बंदीचा प्रश्न अधिक चिघळणार आहे . 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेtollplazaटोलनाका