शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

धरण भरले पण बिघाड व तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 7:30 PM

जोरदार पावसामुळे धरणं भरली असताना पाणी मात्र कमी येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीत झालेल्या सततच्या तांत्रिक बिघाड व अडचणींमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मात्र विपरीत परिणाम झाला आहे. जोरदार पावसामुळे धरणं भरली असताना पाणी मात्र कमी येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. 

शहराला महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. बारवी धरण भरून वाहू लागले असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र पाणी पुरवठा कमी होत आहे. गेल्या काही दिवसात विविध कारणांनी पाणी पुरवठा अपुरा होत आहे . मुसळधार पावसामुळे कचरा अडकून पंप चॉकअप होणे, बंद पडणे, बिघडणे असे प्रकार घडले. दोन वेळा जलवाहिनी फुटली. दुरुस्तीसाठी चार तासांचा शटडाऊन घेतला तरी शहराला पाणी मिळण्यास ८ तास जातात. ते पाणी सुद्धा कमी दाबाने असते. 

पाऊस जोरात असला कि वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा बंद पडतो. त्यातही मीरा भाईंदर हे टेल एन्ड ला असल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुन्हा सुरळीत होण्यास व पाण्याचे प्रेशर वाढण्यास एक - दोन दिवस तर सहज जातात . जेणे करून गेल्या काही दिवसां पासून पाणी कमी येत असल्याने नागरिकांना देखील पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. 

महामंडळाकडून पाणी पुरवठा या विविध तांत्रिक अडचणी, बिघाड यामुळे अगदी ८० ते ८५ दशलक्ष लिटर वर आला होता  स्टेमकडून ८६ दशलक्ष लिटर पाणी येत असले तरी तेथे देखील वीज गेली वा तांत्रिक बिघाड मुळे शटडाऊन घ्यावा लागला होता. परंतु महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा कमी झाल्याने त्याचा जास्त फटका नागरिकांना बसला. जेणेकरून शहरातील पाणी पुरवठा  ४८ ते ६० तासांवर जाऊन पोहचला होता. आता त्यात सुधारणा झाली असून पुरवठा ३८ ते ४० तासांवर आला आहे असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर