शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नगरसेवकांच्या भूमिकेवर संघर्ष समितीची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:28 AM

केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा : चार वर्षांत प्रभागांमध्ये किती विकासकामे केली?

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळू नका. स्वतंत्र नगरपालिकेची गरज नाही, अशी भूमिका २७ गावांतील नगरसेवकांनी घेतल्याने त्यांच्या या भूमिकेविषयी सर्वपक्षीय संघर्ष समितीने तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. नगरसेवकांनी चार वर्षांत त्यांच्या प्रभागांत किती विकासकामे केली, असा खोचक सवाल समितीचे सचिव नरेश पाटील यांनी केला आहे.

केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत नगरसेवक हे संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे महापालिकेतून वगळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी भाजप, संघर्ष समिती, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका व्यासपीठावर होते. शिवसेना सोडून सगळ्यांचा स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस पाठिंबा होता. आजही आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी गावे वगळण्याच्या मागणीला विरोध असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. तरीदेखील काही नगरसेवक २०१७ मध्ये फडवणीस यांना दिलेल्या पत्राचा आधार घेत सर्वच नगरसेवकांचा गावे वगळण्यास विरोध असल्याचे सांगत आहेत. मात्र, हे पत्र जुने असल्याने गावे वगळण्यास आमचा विरोध नाही, असे काही नगरसेवकांनी संघर्ष समितीशी संपर्क करून सांगितले.प्रत्यक्षात, यासंदर्भात पुन्हा नगरसेवकांकडे विचारणा केली की, जुन्या पत्राचा संदर्भ दिला जात आहे. त्यावेळी त्यांनी नव्या पत्राचा दाखला दिला. मात्र, नव्या पत्राच्या शेवटच्या पानावर सात सदस्यांचीच स्वाक्षरी असल्याचे पाहावयास मिळाले.त्याचबरोबर विरोध करणारे भाजप नगरसेवक हे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री व डोंबिवलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आहेत का, असा सवाल केला आहे. तसेच शिवसेनेचे सदस्य त्यांच्या नेतृत्वाविरोधात ही मागणी करीत आहे का, असा दुहेरी प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.विरोध करणाऱ्या काही सदस्यांनी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सगळेच सदस्य हे स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांच्यावर काही लोक दबाब टाकत असल्याने त्यांच्याकडून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीचा नकार दर्शविला जात आहे.यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, ‘स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्यावर मनसे पूर्वीपासून ठाम होती. शिवसेना आता या मागणीसंदर्भात राजकारण खेळत आहे. त्यामुळेच काही सदस्य स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस विरोध करीत आहेत.’स्वतंत्र नगरपालिकाच हिताची-पाटीलसंघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘स्वतंत्र नगरपालिकेची मागणी ही २७ गावांच्या हिताची आहे. तिला जनसमर्थन मिळत असताना जनहिताच्या विरोधात बरळणे म्हणजे हा कोडगेपणा आहे. या सगळ्या मुद्यावरून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीवरून नगरसेवक व संघर्ष समिती तसेच विविध राजकीय पक्ष यांच्यात दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहेत.’

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका