शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

coronavirus: मीरा-भाईंदर मधील फेरीवाल्यांनी व्यापलेली गर्दीची ठिकाणे नियंत्रणाबाहेर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 12:41 IST

coronavirus in Mira Bhayander : मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका , पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका , पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत . फेरीवाल्यांचे बाजार , खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरील गर्दी कोरोना संसर्ग वाढीला मोठे कारण मानले जात असताना देखील अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने ठोस कारवाई केली जात नाही . 

मीरा भाईंदर मध्ये फेरीवाले आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यां वर मोठे अर्थचक्र चालत असते . फेरीवाले जेवढे  तेवढे बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदारांचे उखळ पांढरे होते . शिवाय पालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवक - राजकारण्यांचे अर्थपूर्ण लागेबांधे फेरीवाले वाढवण्यास कारणीभूत ठरले आहेत . 

फेरीवाल्यां विरोधात आधी बोंब करायची मग वजन वाढवून चिडीचूप व्हायचे असा नगरसेवकाचा किस्सा सुद्धा चर्चेत आहे . फेरीवाल्यांच्या हातगाड्या सुद्धा भाड्याने देणारी टोळी आहे . साहजिकच प्रचंड आर्थिक फायद्याच्या ह्या फेरीवाल्यां कडे चराऊ कुरण म्हणून पहिले जात असल्याने शहरात फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले आहे . 

रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संस्था , धार्मिक स्थळं , रुग्णालय परिसरात १०० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे . परंतु तेथे सर्रास फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे . पालिकेच्या ना फेरीवाला क्षेत्रात तर फलकां खालीच पालिकेच्या नाकावर टिच्चून फेरीवाले बसत आहेत . वाहतुकीची कोंडी आणि पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा गंभीर झाली असताना फेरीवाल्यानाच पाठीशी घातले जाते . 

कोरोनाचा संसर्ग एकीकडे पसरत असताना फेरीवाले सुद्धा प्रचंड पसरले आहेत . बहुतांश फेरीवाले हे मास्क न घालताच असतात . अनेकजण नाका - तोंडा खाली मास्क ठेवतात . त्यांचे कडे सॅनिटायझर नसते . फेरीवाल्यांच्या ठिकाणी सतत लोकांची गर्दी होत असते . मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना सुद्धा ते रोखत नाहीत. 

रस्ते - पदपथ वर बसणारे फेरीवाल्यांच्या भाजी व अन्य विक्रेत्यां कडे जशी गर्दी असते तशीच गर्दी खाद्यपदार्थ विक्रेत्या हातगाड्यांवर दिसते . तेथे तर खाण्यासाठी लोकं गर्दी करतात आणि बराच वेळ विना मास्क गर्दी करून एकमेकांच्या संपर्कात राहतात .  

शहरात बेकायदेशीर आठवडे बाजार सुद्धा जोरात चालतात. भाईंदर रेल्वे स्थानका जवळ भल्या पहाटे भरणारा मासळी बाजार असो कि भाईंदरच्या डॉ . आंबेडकर ६० फुटी मार्ग , भाईंदर पूर्व खारीगाव , मीरारोड स्थानक येथे पहाटे भरणारा भाजीचा घाऊक बाजार सुद्धा गर्दीने फुललेला असतो . मास्क न घालणे हे तर नित्याचेच असते. 

रहदारीला व पादचाऱ्यांना नेहमीच वेठीस धरणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांनी आता कोरोना संसर्ग रोखण्याच्या नियम निर्देशांचे सुद्धा उघड उघड उल्लंघन चालवले आहे . परंतु फेरीवाल्यांच्या अर्थचक्रात स्थानिक नगरसेवक , पालिका प्रशासन , बाजार वसुली ठेकेदार आणि संरक्षणकर्ते अश्या संगनमताच्या चक्रात कोरोना संसर्ग सुद्धा वाढीस लागण्याची भर पडली तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर