शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अवघ्या चार दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; मार्केटमध्ये गर्दी, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:34 IST

तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.

ठाणे  : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु यावेळी भाजीचे दर अचानक कडाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 20 रुपयांची कोथिंबिरीची जुडी 80 रुपये झाल्याचे दिसून आले. तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.

तर ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु पुढील 10 दिवस लॉकडाऊन असल्याने विक्रेते हे ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. परंतु भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची आज झोपच उडाल्याचे दिसून आली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसत होते. आधीच तीन महिन्यांनंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तुंच्या वाढत्या दरांमुळे नागरीक हैराण झाले आहे. चार दिवसापूर्वी भाजी खरेदी करताना 20 रुपये असलेले दर 40 ते 80च्या घरात गेलेच कसे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधीच खाण्याचे आबाळ सुरू असताना आता भाज्याही कडाडल्या तर खायचे काय, जगायचे कसे असा सवाल नागरिक करीत आहेत.

भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे कंट्रोल नाही, शासनाकडे वाढणा:या दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
(प्रकाश ताम्हाणे  - ग्राहक, ठाणेकर)

रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत, गुरुवार पासून बंद ठेवण्यात येणार असल्यानेच विक्रेते लुट करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.
(प्रतिभा माने - गृहिणी, ठाणेकर)

पुढील 10 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून आम्ही भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. उलट ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्यानेच आम्हाला नाईलाज आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
(भाजी विक्रेते - जांभळीनाका मार्केट)
आजचे भाज्यांचे दर
भाजी                           पूर्वी         आता
कोबी                      30 रुपये   50 रुपये
शिमला मिर्ची            50          80
टॉमेटो                    30          80
भेंडी                      40          60
गवार                     60          80
कोथिंबीर                20          80
शेपु                       30         40
काकडी                 20         40
मेथी                      20         40
पालक                   10         20