शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

By admin | Updated: January 4, 2016 01:29 IST

गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत.

पालघर : गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामागे लगतच्या जिल्ह्यातील ऊसाची झालेली तोड, बिबळ्यांची वाढती संख्या आणि जंगलात जाणवणारा भक्षांचा अभाव व त्यांचा वीणीचा काळ ही कारणे असल्याचे वनखात्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.हिवाळा हा बिबळ्यांच्या प्रजननाचा काळ आहे. पावसाळ्यात बिबळ्यांच्या नर-मादीचे मिलन होते व हिवाळ्यात मादी पिल्लांना जन्म देते त्यासाठी त्यांना लागणारा एकांत हे नर, मादी बिबळे ठाणे, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या ऊसाच्या फडामध्ये मिळवीत असतात. दिवसभर फडामध्ये अगदी आतल्या बाजूस राहायचे आणि रात्री अथवा पहाटे लगतच्या शेतावरील प्राणी फस्त करायचे अशी त्यांची पद्धती असते. परंतु ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊसाची तोड सुरू होते आणि या बिबळ्यांना पिलासह जवळपासच्या जंगलाचा अथवा मिळेल त्या रानावनाचा आश्रय घ्यावा लागतो. मादी प्रसूत झाल्यामुळे अशक्त झालेली असते. त्यामुळे ती जंगलात शिकार करण्याऐवजी जवळपासच्या मानवी वस्तीत असलेल्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे पसंत करते. कारण ते बांधून ठेवले असल्यामुळे तिच्या तावडीत सहज सापडतात. या कारणाबरोबरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा अभयारण्य यातील बिबळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना आवश्यक त्या प्रमाणात तिथे भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे सध्या धाव घेताहेत. दुसरीकडे रानडुक्करांची संख्या प्रचंड वाढली आहे. ते याच परिसरातल्या गाव-पाड्यातील शेतीला, पिकांना फस्त करण्यासाठी येत असतात. जव्हार तालुक्यात अशा डुकरांच्या हल्ल्यात गेल्याच महिन्यात तीन शेतकरी जखमी झाले होते. या डुकरांची शिकार करण्यासाठी बिबळे गाव-पाड्यानजीक येतात आणि डुकरे मिळाली नाही तर तेथील पाळीव प्राणी उचलून नेतात. यामध्ये वनखात्याच्या हाती पिंजरा लावणे एवढाच उपाय असतो. परंतु तो सुद्धा कुठेही लावता येत नाही. बिबळ्या हा शेड्युल ए मधला प्राणी असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई करताना वनखात्याला असंख्य नियमांचे पालन करावे लागते. बिबळ्याने जनावरे उचलून नेली अथवा त्यांना भक्ष्य केले की गावकरी पिंजरा लावा अशी मागणी करतात. परंतु जोपर्यंत बिबळ्या हा नरभक्षक होत नाही किंबहुना त्याचा उच्छाद निर्माण होत नाही तोपर्यंत पिंजरा लावता येत नाही. तो लावण्याची प्रक्रिया देखील मोठी असते. हे देखील गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे. बिबळ्या हा श्वांपद आहे. शिकार करणे हा त्याचा स्वभाव आणि पोट भरण्याचा भाग आहे. त्यामुळे केवळ त्याने एखाद्या वस्तीतून प्राणी उचलून नेले अथवा मारून खाल्ले या कारणासाठी त्याला पकडण्याकरीता पिंजरा लावता येत नाही. हे समजून घ्यावे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.> कुत्रा, शेळ्या, मेंढया, करडू, गाई, म्हशी हे प्राणी उघड्या गोठ्यात बांधून ठेऊ नका.शक्यतो रात्री लाईट सुरू ठेवा, घराच्या किंवा मळ्यातील घराच्या आसपास शेकोटी पेटवून ठेवा. ते शक्य नसेल तर मशाल, टेंभा, पलिते पेटते ठेवा.घराचे दरवाजे मजबूत ठेवा, खिडक्यांना जाळ्या लावा.