शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

BSUP योजनेत २५० कोटींचा गैरव्यवहार, भाजप नगरसेविका पेंडसेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 2:46 PM

महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयुआरएम) या योजनेअंतर्गत २००८ साली शहरी गरीबांसाठी बीएसयूपी योजना जाहीर झाली होती. पालिकेने चार टप्प्यात या योजनेचे प्रस्ताव मंजूर केले.

ठाणे - शहरात बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी) या योजनेअंतर्गत १२,५५० घरे उभारणीचे डीपीआर केंद्र सरकारने मंजूर केले होते. या कामांसाठी ५६८ कोटी रुपये खर्च येईल, असे गृहित धरून ही मंजूरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या १५ वर्षांत ठाणे महापालिकेने जेमतेम ६३४३ घरांची उभारणी केली असून त्या कामासाठी तब्बल ८०० कोटी रुपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने गृहनिर्माणासाठी गतवर्षी जाहीर केलेले रेडी रेकनरचे दर जरी गृहित धरले तरी प्रत्येक घराच्या उभारणीसाठी ९ लाख रुपये खर्च व्हायला हवा होता. मात्र, पालिकेने त्यासाठी तब्बल १३ लाख रुपये खर्च केल्याची माहिती नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिली. 

महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय सर्वसाधारण सभेत व्यक्त केल्यानंतर त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पारदर्शी पद्धतीने ही चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल अशी आशा मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली आहे.

जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयुआरएम) या योजनेअंतर्गत २००८ साली शहरी गरीबांसाठी बीएसयूपी योजना जाहीर झाली होती. पालिकेने चार टप्प्यात या योजनेचे प्रस्ताव मंजूर केले. मंजूर डिपाआरनुसार १२,५५० घरांच्या उभारणीसाठी ५६८ कोटी ९४ लाख रुपये खर्च होणार होते. त्यापैकी ५० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून तर ३० टक्के अनुदान राज्य सकराकडून दिले जाणार होते. ११ टक्के वाटा हा लाभार्थ्यांचा होता तर ९ टक्के हिस्सा ठाणे महापालिकेला अदा करायचा होता. या योजनेची मुदत डिसेंबर, २०१५ मध्ये संपली. मात्र, २०२१ साल उजाडले तरी १२,५५० पैकी ६,३४३ घरेच पालिकेला खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून उभारता आली आहेत. मंजूर डीपीआरपैकी (५६८ कोटी) जवळपास ५१ टक्के घरे पालिकेला उभारता आली आहेत. त्यामुळे या गृहनिर्माणावर ३१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, पालिकेने या कामासाठी तब्बल ८०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या घरांसाठी केंद्र सरकारकडून १४२ कोटींचे तर, राज्य सरकारकडून ८५ कोटींचे अनुदान अपेक्षित होते. परंतु, पालिकेने निर्धारित वेळेत काम न केल्याने अनुक्रमे १२५ कोटी आणि ६५ कोटी रुपयांचेच अनुदान मिळाले आहे. या घरांसाठी पालिकेच्या तिजोरीतून ९ टक्क्यांप्रमाणे फक्त २७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, पालिकने ६०९ कोटी ७९ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती मृणाल पेंडसे यांनी दिली आहे. पालिकेने ९ टक्के नव्हे तर तब्बल ७६ टक्के खर्च केला असताना  केंद्र आणि राज्याकडून ५० आणि ३० टक्क्यांऐपजी १५.५९ आणि ८.१३ टक्केच निधी मिळाला आहे. पलिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीवर हा अतिरिक्त भार पडला आहे.

अधिकारी कंत्राटदारांचे साटेलोटे

अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्यानेच बीएसयूपी योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही ठाणे शहरातील गोरगरीब कुटुंबांच्या पदरी निकृष्ट घरे टाकण्यात आली आहेत. ही योजना योग्य पध्दतीने राबवली न गेल्याने सरकारचा २५३ कोटी रुपयांच्या अनुदानाला ठाणे शहर मुकले आहे. तर, त्यांच्याच वादग्रस्त कारभारामुळे जवळपास ५०० कोटींचा अतिरीक्त खर्चही झाला आहे. कामाला विलंब झाला, जागा ताब्यात मिळत नव्हती, भाववाढ झाली, घरांचे क्षेत्रफळ वाढले अशी अनेक कारणे त्यासाठी दिली जात आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांतले रेडी रेकनरचे दर गृहीत धरले तर प्रति चौसर फूट बांधकामासाठी २५०० रुपये खर्च व्हायला हवेत. मात्र, या योजनेतील घरांसाठी ३५०० रुपये प्रति चौरस फूट एवढा खर्च करण्यात आला आहे. रेडी रेकनर दरांपेक्षा पालिकेने तब्बल २५३ कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. त्यामुळे या गैरव्यवहाराची सखोल आणि पारदर्शी चौकशी व्हायला हवी अशी मागणी मृणाल पेंडसे यांनी केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCorruptionभ्रष्टाचार