शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जगात भारताचा पहिला क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 11:55 AM

इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार घटना घडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकासान झाले आहे. कोणतेही आंदोलन असताना परिस्थिती चिघळू नये, कोणत्याही अफवा पसरु नये यासाठी सरकारडून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतले जातात. 

इंटरनेट बंद करण्यामध्ये जगभरातून भारताचा पहिला क्रमांक लागत असल्याचे माहिती इंटरनेट शटडाऊंस डॉट इन अहवालानूसार समोर आले आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतामध्ये 2012 पासून आतापर्यत 367 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जागतिक स्तरावर खंडित करण्यात आलेल्या इंटनेटपैकी भारतातील संख्या 67 टक्के आहे.

2018 मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 134 वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. जगाच्या तुलनेत भारतात इंटरनेट बंद करण्यात आलेल्या घटनांची संख्या सर्वाधिक होती. तसेच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 8 वर्षांत सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 

जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 180 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. दहशवादी कारवाया आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमधून  इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 2012 मध्ये 3 वेळा, 2013 मध्ये 5 वेळा, 2014 मध्ये 6 वेळा, 2015 मध्ये 14 वेळा, 2016 मध्ये 31 वेळा, 2017 मध्ये 79 वेळा, 2018 मध्ये 134 वेळा आणि 2019 मध्ये 95 वेळा इंटरनेट बंद ठेवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील इंटरनेट बंद ठेवण्यात भारताचा या वर्षी जगात पहिला नंबर असल्याचे सांगत ट्विट केले आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Maharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिस