शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 5:04 PM

Prakash Ambedkar News: आपल्या शेजारचे देश भारताला आव्हाने देत आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश भारतापासून अंतर ठेवत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेते भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. तर भाजपा विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता भारताच्या परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मालदीवसोबत वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्याने यांनी आर्थिक मदत बंद केली आहे. मालदीव विरोधात कारवाई केली जात आहे. सरकार यावर काहीच बोलल नाही. मालदीव आपल्या सुरक्षचेच्या दृष्टीने महत्त्वाचे बेट आहे. अफगाणिस्तान आता तालिबान चालवत आहे. बांगलादेश सोबतचे आपले संबंध बिघडत चालले आहेत. बाजूचा केवळ भूतान आपल्यासोबत असून, इतर सगळ्या देशांशी संबंध बिघडले आहेत, हे लक्षात येत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे

जर्मनी, फ्रांस हे देश आपल्यापासून अंतर ठेवत आहेत. हे सरकार २०२४ मध्ये जर निवडून आले तर इतर देश कायदा करतील. इतर देशातील किती लोक आपल्या देशात राहणार, याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या भारताला बसणार आहे. आपले शेजारी देश आपल्याला सोडून गेले आहेत. आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

दरम्यान, निर्मला सीतारामन या मोदींच्या व्हॉईस आहेत तर त्यांचे पती देशाचा व्हॉइस आहेत. मणिपूरमध्ये जे घडलं त्यावर आपले लोक गंभीर विचार करत नाहीत हे दुर्दैव आहे. चीन आपल्या देशात घुसत आहे. राजनाथ सिंह म्हणतात की, पीओकेमधील लोक भारतात यायला तयार आहेत. हे खोटे आहे. देशाच्या सुरक्षेला धोका आहे. नेपाळ आपल्या देशाला आव्हान देत आहे. त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा भाग दाखवला आहे. उत्तराखंड माधला हा सगळा भाग आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४