शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

येत्या काळात पर्यावरणपूरक वाहनांचा असणार दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 05:00 IST

जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०१८ मध्ये १२९६७.१५६ कोटी डॉलर्सवर होती आणि २०२५ अखेर ती ३५९८५.४५६ कोटी डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे.

- ओंकार भिडेजागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०१८ मध्ये १२९६७.१५६ कोटी डॉलर्सवर होती आणि २०२५ अखेर ती ३५९८५.४५६ कोटी डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठवाढीचा दर वर्षाला १५.६९ टक्के राहणार आहे, पण जागातिक पातळीवर युरोपात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती खूप चांगली असल्याने युरोपीय बाजारपेठत इलेक्ट्रिक वाहनांचा वाढीचा दर एकसारखा राहील. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये म्हणजे प्रामुख्याने आशिया प्रशांत भागात इलेक्ट्रिक वाहनांची चलती राहणार आहे. आशिया प्रशांतनंतर युरोप व त्यानंतर उत्तर अमेरिकेची बाजारपेठ राहील, असा अंदाजव्हॅल्युटेस संस्थेने वर्तविला आहे.भारतात आर्थिक उदारीकरणानंतरही एक हजार लोकांमागे २२ लोकांकडे कार आहेत. अमेरिका व ब्रिटन या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास हे प्रमाण अनुक्रमे ९८० व ८५० आहे, तसेच चीनमध्ये कारचे प्रमाण १६२ आहे. यावरूनच भारतीय वाहन बाजारपेठेत वाढीस किती वाव आहे, हे लक्षात येते. त्यामुळे २०१८ व १९ मध्ये अनेक नवीन वाहन कंपन्या भारतात आल्या, तर पुढील वर्षभरात अजून काही कंपन्या येणार आहेत.गेल्या दोन वर्षांपासून भारतीय वाहन उद्योगला वाहन विक्रीत घसरणीस सामोर जावे लागले आहे. भारत ही जगातील दुसºया क्रमांकाची दुचाकींची, पाचव्या क्रमांकाची चार चाकींची व सातव्या क्रमांकाची व्यावसायिक वाहनांची बाजारपेठ आहे. वाहन विकत घेण्याचे पर्याय बदलणार आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)च्या मते भारतात पुढील दोन दशकांत १,००० लोकांमागे कारचे प्रमाण १७५ वर जाण्याची अपेक्षा असून, ७७५ टक्के वाढ नोंदली जाऊ शकते. त्यामुळे वेगाने वाढणाºया या बाजारपेठेसाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराविषयीचा एक रोडमॅप तयार केला आहे. त्यानुसार, भारतात शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व सार्वजनिक वाहने ही २०३० मध्ये संपूर्णपणे इलेक्ट्रिकवरील असणार आहेत, तसेच २०३० मध्ये एकूण वाहनविक्रीच्या तुलनेत विकली जाणाºया सर्व नव्या वाहनांचे प्रमाण ४० टक्के असेल. २०४७ अखेर देशातील सर्व वाहने केवळ इलेक्ट्रिक वाहनेच करण्याचे धोरण आखले आहे. सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात एप्रिल ते मार्च, २०१८-१९ मध्ये ३०,९१५,४२० वाहनांची विक्री झाली. २०१७-१८ च्या तुलनेत वाढीचा दर ६.२६ टक्के आहे.भारतात केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणामुळे चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक व खासगी स्वरूपात उभारली जाणार आहेत. यामध्ये गुंतवणुकीस मोठा वाव आहे, तसेच भारतात जागतिक पातळीवरील बहुतेक सर्व वाहन कंपन्यांनी प्रवेश (काही अपवाद वगळता) केला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही तरुण अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर येथेच व्यवसाय करण्याच्या संधी मोठ्या आहेत. त्यामुळे या बाजारपेठेकडे भविष्यातील बदलांसाठी कंपन्यांनीही सज्ज होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय वाहन कंपन्यादेखील याबाबतीत मागे नाहीत. त्यांनीही इलेक्ट्रिकसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित करण्यास सुरुवात केली आहे, तसेच सध्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, निस्सान, एमजी मोटर, महिंद्र अँड महिंद्र, रेनॉ, मर्सिडिज बेंझ, आॅडी, हीरो, होंडा, टीव्हीएस, प्यूजो, बजाज आॅटो, रिव्होल्ट आदी कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात येणार आहेत.79% प्रमाण देशातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे12% प्रमाण दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारचे4% प्रमाण तीनचाकींचे3% प्रमाण बस व मोठे मोठी व्यावसायिक वाहने2% प्रमाण दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कारचे