शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

येत्या काळात पर्यावरणपूरक वाहनांचा असणार दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 05:00 IST

जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०१८ मध्ये १२९६७.१५६ कोटी डॉलर्सवर होती आणि २०२५ अखेर ती ३५९८५.४५६ कोटी डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे.

- ओंकार भिडेजागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०१८ मध्ये १२९६७.१५६ कोटी डॉलर्सवर होती आणि २०२५ अखेर ती ३५९८५.४५६ कोटी डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठवाढीचा दर वर्षाला १५.६९ टक्के राहणार आहे, पण जागातिक पातळीवर युरोपात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती खूप चांगली असल्याने युरोपीय बाजारपेठत इलेक्ट्रिक वाहनांचा वाढीचा दर एकसारखा राहील. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये म्हणजे प्रामुख्याने आशिया प्रशांत भागात इलेक्ट्रिक वाहनांची चलती राहणार आहे. आशिया प्रशांतनंतर युरोप व त्यानंतर उत्तर अमेरिकेची बाजारपेठ राहील, असा अंदाजव्हॅल्युटेस संस्थेने वर्तविला आहे.भारतात आर्थिक उदारीकरणानंतरही एक हजार लोकांमागे २२ लोकांकडे कार आहेत. अमेरिका व ब्रिटन या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास हे प्रमाण अनुक्रमे ९८० व ८५० आहे, तसेच चीनमध्ये कारचे प्रमाण १६२ आहे. यावरूनच भारतीय वाहन बाजारपेठेत वाढीस किती वाव आहे, हे लक्षात येते. त्यामुळे २०१८ व १९ मध्ये अनेक नवीन वाहन कंपन्या भारतात आल्या, तर पुढील वर्षभरात अजून काही कंपन्या येणार आहेत.गेल्या दोन वर्षांपासून भारतीय वाहन उद्योगला वाहन विक्रीत घसरणीस सामोर जावे लागले आहे. भारत ही जगातील दुसºया क्रमांकाची दुचाकींची, पाचव्या क्रमांकाची चार चाकींची व सातव्या क्रमांकाची व्यावसायिक वाहनांची बाजारपेठ आहे. वाहन विकत घेण्याचे पर्याय बदलणार आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)च्या मते भारतात पुढील दोन दशकांत १,००० लोकांमागे कारचे प्रमाण १७५ वर जाण्याची अपेक्षा असून, ७७५ टक्के वाढ नोंदली जाऊ शकते. त्यामुळे वेगाने वाढणाºया या बाजारपेठेसाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराविषयीचा एक रोडमॅप तयार केला आहे. त्यानुसार, भारतात शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व सार्वजनिक वाहने ही २०३० मध्ये संपूर्णपणे इलेक्ट्रिकवरील असणार आहेत, तसेच २०३० मध्ये एकूण वाहनविक्रीच्या तुलनेत विकली जाणाºया सर्व नव्या वाहनांचे प्रमाण ४० टक्के असेल. २०४७ अखेर देशातील सर्व वाहने केवळ इलेक्ट्रिक वाहनेच करण्याचे धोरण आखले आहे. सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात एप्रिल ते मार्च, २०१८-१९ मध्ये ३०,९१५,४२० वाहनांची विक्री झाली. २०१७-१८ च्या तुलनेत वाढीचा दर ६.२६ टक्के आहे.भारतात केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणामुळे चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक व खासगी स्वरूपात उभारली जाणार आहेत. यामध्ये गुंतवणुकीस मोठा वाव आहे, तसेच भारतात जागतिक पातळीवरील बहुतेक सर्व वाहन कंपन्यांनी प्रवेश (काही अपवाद वगळता) केला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही तरुण अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर येथेच व्यवसाय करण्याच्या संधी मोठ्या आहेत. त्यामुळे या बाजारपेठेकडे भविष्यातील बदलांसाठी कंपन्यांनीही सज्ज होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय वाहन कंपन्यादेखील याबाबतीत मागे नाहीत. त्यांनीही इलेक्ट्रिकसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित करण्यास सुरुवात केली आहे, तसेच सध्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, निस्सान, एमजी मोटर, महिंद्र अँड महिंद्र, रेनॉ, मर्सिडिज बेंझ, आॅडी, हीरो, होंडा, टीव्हीएस, प्यूजो, बजाज आॅटो, रिव्होल्ट आदी कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात येणार आहेत.79% प्रमाण देशातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे12% प्रमाण दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारचे4% प्रमाण तीनचाकींचे3% प्रमाण बस व मोठे मोठी व्यावसायिक वाहने2% प्रमाण दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कारचे