शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

या मोबाईलचं करावं काय...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 10:57 IST

सध्याच्या काळात मोबाईल हे अत्यंत बहुउपयोगी साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते.अगदी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखा एका क्षणात हवं ते क्षणात ...

ठळक मुद्देमोबाईल हे दुधारी शस्त्र बनत आहे सांभाळून वापरावे लागेल जोपर्यंत आपण मोठी माणसं मोबाईल साक्षर होणार नाहीतवेळ, श्रम, पैसा यांचा होणारा अपव्यय आपणास खरंच टाळता येतो का?

सध्याच्या काळात मोबाईल हे अत्यंत बहुउपयोगी साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते.अगदी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखा एका क्षणात हवं ते क्षणात समोर आणून उभा करतो. पण त्याचा वापर करता करता सवयीचं रुपांतर व्यसनाधीनतेत कधी आणि कसं झालं ते कुणालाच कळलं नाही. शाळेत असताना असून अडचण नसून खोळंबा ही म्हण फक्त तोंडपाठ केली होती. त्याची प्रचिती मोबाईलबाबतीत येत आहे.

 मागील आठवड्यात मोबाईल हवा (पहिले दोन मोबाईल असताना) म्हणून एका युवकाने आत्महत्या केली. मोबाईल खेळू नकोस म्हणून आई रागावली की मुलाने आत्महत्या केली. टिक टाँक अ‍ॅप वरती मस्ती करताना तिघांचा बळी, सेल्फी घेत असताना गेलेले शेकडो बळी अशा एकंदर घटनांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यामध्ये केवळ मुले,युवक वा मुली आहेत असं नाही तर सर्वच वयोगटातील आबालवृद्धांच्या समावेश आहे.आज मोबाईलशिवाय माणूस कल्पना करणं जरा कठीण वाटावं इतका सर्वाठायी याचा वापर होत आहे आणि हेच आजच्या घटनांचं कारण ठरत आहे. मग या मोबाईलचं करावं तरी काय असा प्रश्न पडतो? 

प्रत्येक मोबाईल वापरणाºयांनी स्वत:शी प्रामाणिक राहून आज आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.आपण दिवसभरात किती तास मोबाईल वापरतो.केवळ बोलणे, वागणे महत्त्वाच्या कामासाठी किती वेळ मोबाईल वापरतो. रात्री किती वेळ आपण याचा वापर करतो.आपली झोपतरी पूर्ण होते का? आपण लहान मुलांना का मोबाईल देतो ? खरंच ते योग्य आहे का ? शाळकरी मुलांना खरंच यांची गरज आहे का ? लहानथोर सारेच मोबाईलवर गेम खेळताना अक्षरश: वेडे होऊन जातात ते टाळून खरंच याला काही पर्याय निघू शकतो का? सर्व प्रश्नांची उत्तरे समर्पक डाऊनलोड होतात का?

वेळ, श्रम, पैसा यांचा होणारा अपव्यय आपणास खरंच टाळता येतो का? आज माणसं माणसाजवळ असली तरी मुकी व संवेदनाहीन का बनत आहेत? खरंच आज मृत्यूचे कारण मोबाईल होऊन गेलेले जीव परत आणता तर येणार नाहीतच पण पुढे होऊ नयेत म्हणून काही करता येईल का ? यावर सामाजिक चिंतन व्हायलाच हवं.कारण कोणत्याही गरजेचं हौसेत अतिरेकी रुपांतर झालं की चिंतेचं कारण बनतं,तेव्हा सावधान..  आमच्या अस्वास्थ्याच्या अनेक कारणांपैकी एक ठोस कारण आमचा मोबाईल बनला आहे.तो इतका की घरात मीठ नसलं तर नो प्रॉब्लेम पण मोबाईलला नेट हवंच,इतकं ते मूलभूत ठरावं,यावर विचार करावा लागेल.अगदी जाणीवपूर्वक. या मोबाईलचं करावं काय ? त्याला टाळता तर येणार नाही आणि कवटाळूनही चालणार नाही.

 जोपर्यंत आपण मोठी माणसं मोबाईल साक्षर होणार नाहीत, मोबाईल वापराबाबत अनभिज्ञता टाळणार नाही,तोपर्यंत मुलांना आपण काही सांगू शकणार नाही. काही जणांना तर अगदी उजाडलेलंही लक्षात येत नाही. मोबाईल वापरताना सारासार विचार करणं यावर आज आत्ता ताबडतोब करावा लागेल नाहीतर मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्याची वेळ येईल.तेव्हा सावधान...आगे बहुत बडा धोका है ’. आपलं लाईफव्हॅल्यू लाईक्स वा कमेंटवर किंवा फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंडच्या संख्येवर ठरवू नका.आम्ही संवेदनशीलता हरवत चाललो आहोत. माणसात राहून माणसासारखे राहू या..

मोबाईल हे दुधारी शस्त्र बनत आहे सांभाळून वापरावे लागेल. कोणतीही गाडी चालवताना मोबाईल वापरुच नये,मुलांच्या काळजीपोटी जरुर त्यांना मोबाईल द्या पण फक्त संपर्कासाठी उपयोगी पडावा असाच तो असावा, महागड्या मोबाईल संग्रहापेक्षा लाख मोलाची माणसं जोडू या. आम्ही सध्या फार काळ आॅनलाईन असतो थोडं आॅफलाईनही राहू या. याचा सराव करुया. घरात काडीपेटी असते त्याने दिवा व आग दोन्ही लावता येते म्हणून आपण ऊठसूठ आग थोडीच लावतो ? तेच तंत्र आज मोबाईल बाबत वापरलं,मोबाईल वापरायचं खरंच काही वेळापत्रक बनवता येईल (कॉलशिवाय) , टाईम लिमिट  ठेवूया. जीवन सुंदर आहेच जगणंही खूप खूप सुंदर बनेल.असं वाटतं चला तर मग... विचार करुया....अगदी नक्कीच... - रवींद्र देशमुख(लेखक सृजनशील साहित्यिक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटर