शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

या मोबाईलचं करावं काय...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 10:57 IST

सध्याच्या काळात मोबाईल हे अत्यंत बहुउपयोगी साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते.अगदी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखा एका क्षणात हवं ते क्षणात ...

ठळक मुद्देमोबाईल हे दुधारी शस्त्र बनत आहे सांभाळून वापरावे लागेल जोपर्यंत आपण मोठी माणसं मोबाईल साक्षर होणार नाहीतवेळ, श्रम, पैसा यांचा होणारा अपव्यय आपणास खरंच टाळता येतो का?

सध्याच्या काळात मोबाईल हे अत्यंत बहुउपयोगी साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते.अगदी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखा एका क्षणात हवं ते क्षणात समोर आणून उभा करतो. पण त्याचा वापर करता करता सवयीचं रुपांतर व्यसनाधीनतेत कधी आणि कसं झालं ते कुणालाच कळलं नाही. शाळेत असताना असून अडचण नसून खोळंबा ही म्हण फक्त तोंडपाठ केली होती. त्याची प्रचिती मोबाईलबाबतीत येत आहे.

 मागील आठवड्यात मोबाईल हवा (पहिले दोन मोबाईल असताना) म्हणून एका युवकाने आत्महत्या केली. मोबाईल खेळू नकोस म्हणून आई रागावली की मुलाने आत्महत्या केली. टिक टाँक अ‍ॅप वरती मस्ती करताना तिघांचा बळी, सेल्फी घेत असताना गेलेले शेकडो बळी अशा एकंदर घटनांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यामध्ये केवळ मुले,युवक वा मुली आहेत असं नाही तर सर्वच वयोगटातील आबालवृद्धांच्या समावेश आहे.आज मोबाईलशिवाय माणूस कल्पना करणं जरा कठीण वाटावं इतका सर्वाठायी याचा वापर होत आहे आणि हेच आजच्या घटनांचं कारण ठरत आहे. मग या मोबाईलचं करावं तरी काय असा प्रश्न पडतो? 

प्रत्येक मोबाईल वापरणाºयांनी स्वत:शी प्रामाणिक राहून आज आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.आपण दिवसभरात किती तास मोबाईल वापरतो.केवळ बोलणे, वागणे महत्त्वाच्या कामासाठी किती वेळ मोबाईल वापरतो. रात्री किती वेळ आपण याचा वापर करतो.आपली झोपतरी पूर्ण होते का? आपण लहान मुलांना का मोबाईल देतो ? खरंच ते योग्य आहे का ? शाळकरी मुलांना खरंच यांची गरज आहे का ? लहानथोर सारेच मोबाईलवर गेम खेळताना अक्षरश: वेडे होऊन जातात ते टाळून खरंच याला काही पर्याय निघू शकतो का? सर्व प्रश्नांची उत्तरे समर्पक डाऊनलोड होतात का?

वेळ, श्रम, पैसा यांचा होणारा अपव्यय आपणास खरंच टाळता येतो का? आज माणसं माणसाजवळ असली तरी मुकी व संवेदनाहीन का बनत आहेत? खरंच आज मृत्यूचे कारण मोबाईल होऊन गेलेले जीव परत आणता तर येणार नाहीतच पण पुढे होऊ नयेत म्हणून काही करता येईल का ? यावर सामाजिक चिंतन व्हायलाच हवं.कारण कोणत्याही गरजेचं हौसेत अतिरेकी रुपांतर झालं की चिंतेचं कारण बनतं,तेव्हा सावधान..  आमच्या अस्वास्थ्याच्या अनेक कारणांपैकी एक ठोस कारण आमचा मोबाईल बनला आहे.तो इतका की घरात मीठ नसलं तर नो प्रॉब्लेम पण मोबाईलला नेट हवंच,इतकं ते मूलभूत ठरावं,यावर विचार करावा लागेल.अगदी जाणीवपूर्वक. या मोबाईलचं करावं काय ? त्याला टाळता तर येणार नाही आणि कवटाळूनही चालणार नाही.

 जोपर्यंत आपण मोठी माणसं मोबाईल साक्षर होणार नाहीत, मोबाईल वापराबाबत अनभिज्ञता टाळणार नाही,तोपर्यंत मुलांना आपण काही सांगू शकणार नाही. काही जणांना तर अगदी उजाडलेलंही लक्षात येत नाही. मोबाईल वापरताना सारासार विचार करणं यावर आज आत्ता ताबडतोब करावा लागेल नाहीतर मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्याची वेळ येईल.तेव्हा सावधान...आगे बहुत बडा धोका है ’. आपलं लाईफव्हॅल्यू लाईक्स वा कमेंटवर किंवा फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंडच्या संख्येवर ठरवू नका.आम्ही संवेदनशीलता हरवत चाललो आहोत. माणसात राहून माणसासारखे राहू या..

मोबाईल हे दुधारी शस्त्र बनत आहे सांभाळून वापरावे लागेल. कोणतीही गाडी चालवताना मोबाईल वापरुच नये,मुलांच्या काळजीपोटी जरुर त्यांना मोबाईल द्या पण फक्त संपर्कासाठी उपयोगी पडावा असाच तो असावा, महागड्या मोबाईल संग्रहापेक्षा लाख मोलाची माणसं जोडू या. आम्ही सध्या फार काळ आॅनलाईन असतो थोडं आॅफलाईनही राहू या. याचा सराव करुया. घरात काडीपेटी असते त्याने दिवा व आग दोन्ही लावता येते म्हणून आपण ऊठसूठ आग थोडीच लावतो ? तेच तंत्र आज मोबाईल बाबत वापरलं,मोबाईल वापरायचं खरंच काही वेळापत्रक बनवता येईल (कॉलशिवाय) , टाईम लिमिट  ठेवूया. जीवन सुंदर आहेच जगणंही खूप खूप सुंदर बनेल.असं वाटतं चला तर मग... विचार करुया....अगदी नक्कीच... - रवींद्र देशमुख(लेखक सृजनशील साहित्यिक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटर