शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 14:09 IST

एक फॉर्म भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. अर्जातील प्रत्येक कॉलम भरणे आवश्यक असून, उमेदवारांचा अर्ज दहा ते बारा अधिकारी पाच ते सात वेळा पडताळणी करून कागदपत्रे तपासली जातात.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : निवडणूक म्हटलं की प्रत्येक घडामोडींवर प्रत्येकाची नजर असतेच. निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमेदवारानं किती खर्च करायचा, याबाबतचे नियम व अटी निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत. एका उमेदवाराला विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला किती खर्च येतो? अर्ज भरताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात? फॉर्म भरायला किती वेळ अन् किती खर्च येतो? याबाबतचा घेतलेला हा छोटासा आढावा. निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यास व स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज हा १०० रुपयाला मिळत असून, तो ४० पानांचा आहे. एक फॉर्म भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. अर्जातील प्रत्येक कॉलम भरणे आवश्यक असून, उमेदवारांचा अर्ज दहा ते बारा अधिकारी पाच ते सात वेळा पडताळणी करून कागदपत्रे तपासली जातात. अंतिम निर्णय झाल्यानंतर तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केला जातो. यावेळी मी दिलेली माहिती खरी असून, ती खोटी निघाल्यास माझ्यावर कारवाई करावी, अशी शपथ घ्यावी लागते. दरम्यान, उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीचे, अपडेटचे चित्रीकरण करण्यात येते.

ही माहिती हवी अर्जामध्ये उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, शिक्षण, एकूण संपत्ती, गाड्या, पॅनकार्ड, रेशन कार्ड, वीजबिल, नोटरी केलेले प्रमाणपत्र आदी विविध महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. अर्ज दाखल करतेवेळी मी अर्जात दिलेली माहिती ही खरी असून, खोटी आढळून आल्यास माझ्यावर कारवाई करावी, याबाबतची शपथ उमेदवारी अर्ज दाखल करणार्या प्रत्येकाला घ्यावी लागते. याचे चित्रीकरणही करण्यात येते.

गुन्ह्यांची माहिती, संपत्ती अन् बरेच काही 

अर्ज सादर करताना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वकिलाकडून नोटरी करून देणे बंधनकारक आहे. यात एकूण संपत्तीची माहिती, गुन्ह्यांची माहिती, वाहने, जमीन, शेती व अन्य विषयांसंदर्भात माहिती देण्यासाठी उमेदवार वकिलांचा सल्ला घेऊन ते नोटरीमध्ये लिखित स्वरूपात उतरवितात. छाननीवेळी ऑब्जेक्शन लागल्यास वकिलांमार्फतच तो सोडविला जातो. 

पक्षांना चिन्ह... अपक्षांना पसंतीची संधी.. 

राष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या उमेदवारांना त्यांचे त्यांचे चिन्ह असते. मात्र, अपक्ष उमेदवारांना चिन्ह कोणतं हवं त्यासंदर्भातील पसंत करण्यासाठी अर्जासोबतच तीन चिन्ह सांगावे लागतात, त्यातील जे उपलब्ध आहे ते चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी देतात. उमेदवारी अर्ज सादर करताना कार्यालयात किमान तासाभराचा वेळ लागतो. 

तर होतेय अनामत रक्कम जप्त 

अर्ज दाखल करताना उमेदवारास अनामत रक्कम भरावी लागते. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतापैकी १६.६ टक्के मते जर संबंधित उमेदवारास न पडल्यास अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडून जप्त केली जाते. उमेदवारी अर्ज हा इंग्रजी व मराठी भाषेत लिहिणे बंधनकारक आहे. अनामत रक्कम भरताना ती रोख किंवा बँकेत भरावी लागते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीVotingमतदान