शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

सोलापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीचा आलेख वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:06 PM

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे.

ठळक मुद्देबिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे

सोलापूर: जिल्हा बँकेची शेतीसाठीच्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच असून, जिल्हाभरातील १५ मार्चपर्यंत अवघी २० टक्के वसुली झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याची अवघी ६ टक्के वसुली झाल्याचे आकडेवारी सांगते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे. साखर कारखान्यांकडील थकबाकी येत नसल्याने बँकेने कारखान्यांचा ताबा घेणे व त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असताना शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे.

या आर्थिक वर्षात १५ मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्याची शेती कर्जाची वसुली अवघी २०.८९ टक्के इतकी आहे. मोहोळ तालुक्याची वसुली ३९.८० टक्के इतकी असून, जिल्ह्यात वसुलीत मोहोळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे. माळशिरस तालुका ३४.५४ टक्के वसुली करुन जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची वसुली ही २९ टक्के असून, हा तालुका तिसºया क्रमांकावर आहे. माढा तालुक्याची वसुली २४.२४ तर करमाळा तालुक्याची वसुली २१.७२ टक्के इतकी आहे. सांगोला तालुका वसुलीत सहाव्या क्रमांकावर असून, या तालुक्याची वसुलीची टक्केवारी २०.८२ इतकी आहे.

पंढरपूर तालुक्याची वसुली मागील वर्षीप्रमाणेच असून, २०.५८ टक्के इतकी आहे. बार्शी तालुका १६.८९ टक्के वसुली करुन आठव्या क्रमांकावर तर अक्कलकोट तालुका १५.२८ टक्के वसुली करुन नवव्या स्थानी आहे. मंगळवेढ्याची वसुली अवघी १२.४७ टक्के इतकी असून, दक्षिण सोलापूर तालुक्याची वसुली ६.१० टक्के इतकी आहे. 

दहा कारखान्यांची दिली वसुलीच्जिल्ह्यातील यावर्षी गाळप घेतलेल्या ३० पैकी अवघ्या १० साखर कारखान्यांनी शेतकºयांकडील शेती कर्जाच्या वसुलीसाठी सहकार्य केले आहे. गाळपासाठी आलेल्या उसातून जिल्हा बँकेचे कर्ज कपात करुन विठ्ठलराव शिंदे, सहकार महर्षी, पांडुरंग श्रीपूर, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील, सिद्धनाथ शुगर, आदिनाथ करमाळा, मकाई करमाळा, कूर्मदास माढा व विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्यांनी बँकेला वसुली दिली तर इंद्रेश्वर बार्शी व फॅबटेक या कारखान्यांनी काहीअंशी सहकार्य केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

कर्जमाफीच्या चर्चेने कर्जच भरेनात...

  • - २०११-१२ व १२-१३ या दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. 
  • - दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात घट झाल्याने बँकेची थकबाकी वाढल्याचे कारण सांगितले जात होते.
  • - मागील वर्षभरापासून कर्जमाफीच्या मागणीला जोर आल्याने संपूर्ण कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी कर्ज भरले नाही.
  • - आता कर्जमाफी झाल्याने जिल्हा बँकेला ३३० कोटी रुपये आले असले तरी नव्याने कर्ज घेणारे थकबाकीत गेले आहेत.
  • - मागील वर्षी याच कालावधीची वसुली १८.९० टक्के होती. यावर्षी कर्जमाफीची ३३० कोटी इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होऊनही वसुलीची टक्केवारी २०.८९ इतकी आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी