शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

करमाळ्यातील साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:39 IST

भविष्याची चिंता: अद्याप एकही समाधानकारक पाऊस नाही

ठळक मुद्देअद्याप एकही मोठा पाऊस करमाळा तालुक्यात पडलेला नाही४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर उभी खरीप पिके वाया जाण्याची भीतीभविष्याची चिंता शेतक ºयांना सतावू लागली

करमाळा :  निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्याप एकही मोठा पाऊस करमाळा तालुक्यात पडलेला नाही. पाऊस हुलकावणी देत असल्याने ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर उभी खरीप पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भविष्याची चिंता शेतक ºयांना सतावू लागली आहे.

करमाळा तालुक्यात रोहिणी नक्षत्रात पावसाचा फक्त शिडकावा झाला. त्यानंतर मृग,आर्द्रा, पुनर्वसू व पुष्य ही चारही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. आकाशात ढगांची गर्दी होते; पण दोन..चार थेंब पडतात व पाऊस गायब होतो, असे चित्र सध्या करमाळा तालुक्यात आहे. रोहिण्या बरसल्यानंतर शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर जमिनीची मशागत केली.

 तालुक्यात खरीप अंतर्गत बाजरी ४४४ हेक्टर, मका १०७८ हेक्टर, तूर १५१६ हेक्टर, मूग ४२० हेक्टर, उडीद ६१६ हेक्टर, सूर्यफूल १४५ हेक्टर पेरण्या झाल्या असून, पेरलेले बी उगवलेही, पण पाऊस दररोज हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. करमाळा तालुक्यात शेतजमिनीचे एकूण १ लाख ५७ हजार ७२४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी लागवडयुक्त शेती १ लाख २७ हजार ५६१ हेक्टर क्षेत्र आहे. 

रब्बी पिकाचा तालुका म्हणून करमाळा शासनदरबारी नोंदलेला आहे. गतवर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्याने खरिपाची १३ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावरच खरीप पेरण्या झालेल्या आहेत.

सरासरी ७७.३१ मि. मी.पावसाची नोंद- करमाळा तालुक्यात आठ महसूल मंडळे असून, प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये आजअखेर पडलेला पाऊस- करमाळा १३६.५ मि. मी., जेऊर ८२ मि. मी., सालसे ६७ मि. मी., कोर्टी १०१ मि. मी., केम ५६ मि.मी., अर्जुननगर १२ मि. मी., केत्तूर ६१ मि. मी., उम्रड १०३ मि. मी. याप्रमाणे सरासरी ७७.३१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जलसाठे कोरडेच..- करमाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ब्रेक दिल्याने मांगी लघुप्रकल्पात २० टक्के पाणीसाठा असून, वडशिवणे, राजुरी, पारेवाडी, हिंगणी, नेरले, म्हसेवाडी, कुंभेज, सांगवी, वीट हे सर्व मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत. ८० टक्के विहिरी, ४८ टक्के पाझर तलाव क ोरडे असून, सीना नदीवरील तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयात पाण्याची पातळी तळपातळीत असून, सीना नदी अद्याप वाहिलेली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती