शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

करमाळ्यातील साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:39 IST

भविष्याची चिंता: अद्याप एकही समाधानकारक पाऊस नाही

ठळक मुद्देअद्याप एकही मोठा पाऊस करमाळा तालुक्यात पडलेला नाही४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर उभी खरीप पिके वाया जाण्याची भीतीभविष्याची चिंता शेतक ºयांना सतावू लागली

करमाळा :  निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्याप एकही मोठा पाऊस करमाळा तालुक्यात पडलेला नाही. पाऊस हुलकावणी देत असल्याने ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर उभी खरीप पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भविष्याची चिंता शेतक ºयांना सतावू लागली आहे.

करमाळा तालुक्यात रोहिणी नक्षत्रात पावसाचा फक्त शिडकावा झाला. त्यानंतर मृग,आर्द्रा, पुनर्वसू व पुष्य ही चारही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. आकाशात ढगांची गर्दी होते; पण दोन..चार थेंब पडतात व पाऊस गायब होतो, असे चित्र सध्या करमाळा तालुक्यात आहे. रोहिण्या बरसल्यानंतर शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर जमिनीची मशागत केली.

 तालुक्यात खरीप अंतर्गत बाजरी ४४४ हेक्टर, मका १०७८ हेक्टर, तूर १५१६ हेक्टर, मूग ४२० हेक्टर, उडीद ६१६ हेक्टर, सूर्यफूल १४५ हेक्टर पेरण्या झाल्या असून, पेरलेले बी उगवलेही, पण पाऊस दररोज हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. करमाळा तालुक्यात शेतजमिनीचे एकूण १ लाख ५७ हजार ७२४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी लागवडयुक्त शेती १ लाख २७ हजार ५६१ हेक्टर क्षेत्र आहे. 

रब्बी पिकाचा तालुका म्हणून करमाळा शासनदरबारी नोंदलेला आहे. गतवर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्याने खरिपाची १३ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र ४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावरच खरीप पेरण्या झालेल्या आहेत.

सरासरी ७७.३१ मि. मी.पावसाची नोंद- करमाळा तालुक्यात आठ महसूल मंडळे असून, प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये आजअखेर पडलेला पाऊस- करमाळा १३६.५ मि. मी., जेऊर ८२ मि. मी., सालसे ६७ मि. मी., कोर्टी १०१ मि. मी., केम ५६ मि.मी., अर्जुननगर १२ मि. मी., केत्तूर ६१ मि. मी., उम्रड १०३ मि. मी. याप्रमाणे सरासरी ७७.३१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जलसाठे कोरडेच..- करमाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ब्रेक दिल्याने मांगी लघुप्रकल्पात २० टक्के पाणीसाठा असून, वडशिवणे, राजुरी, पारेवाडी, हिंगणी, नेरले, म्हसेवाडी, कुंभेज, सांगवी, वीट हे सर्व मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत. ८० टक्के विहिरी, ४८ टक्के पाझर तलाव क ोरडे असून, सीना नदीवरील तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयात पाण्याची पातळी तळपातळीत असून, सीना नदी अद्याप वाहिलेली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती