शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोलापुरात आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या चौथ्या लग्नावेळी नातेवाईक चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 2:12 PM

सोलापूर शहर पोलीस ; तिघांविरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देतीन मुलींशी विवाह करून त्यांना पैशासाठी माहेरी हाकलून दिल्यानंतर प्रकाश जानगवळी हा पुन्हा चौथ्या पत्नीच्या शोधात होतातिघींनी सोलापूर  गाठून प्रकाश जानगवळी याच्याविरुद्ध फिर्याद दिली

सोलापूर : पहिल्या पत्नीला पैशाच्या कारणावरून मारहाण करून माहेरी पाठवले, दुसरीशी विवाह करून तीच अवस्था केली. तिसरी बरोबर विवाह करूनही तोच प्रकार सुरू ठेवला. तिघींनाही सोडून चौथ्या मुलीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो मी नव्हेच..’ या गाजलेल्या नाटकातील लखोबा लोखंडे हा प्रत्यक्षात सोलापुरात अवतरला आहे. तिन्ही बायकांनी प्रकाश याच्यासह तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाशची आई हिराबाई, भाऊ किशोर यांना अटक केली आहे.

पती प्रकाश महादेव जानगवळी (वय ४२, रा. शेळगी, सोलापूर), दीर- किशोर महादेव जानगवळी, सासू- हिराबाई महादेव जानगवळी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, प्रकाश जानगवळी हा रिक्षा चालक असून त्याने १९ फेब्रुवारी २००६ रोजी विजापूर येथील १२ वी शिकलेल्या रजनी या मुलीशी   लग्न केले. लग्नात ६ तोळे सोने आणि ५0 हजार रुपयांचा हुंडा देऊन सासरच्या लोकांनी विजापूर येथे थाटामाटात लग्न लावून दिले. दोन महिन्याचा संसार चांगला चालतो न चालतो तोच प्रकाश याने पत्नी रजनी हिला नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा सुरू केला. पैशासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली. 

रजनी हिला माहेरी सोडून आल्यानंतर सासºयाने एक लाख रुपये गोळा करून पुन्हा मुलीला प्रकाश याच्याकडे नांदण्यासाठी सोडले; मात्र पुन्हा त्याने गाडीची मागणी केली. रजनीच्या काकांनी गाय घेऊन दिली. काही दिवसानंतर पुन्हा पैशाची मागणी करू लागला. या त्रासाला कंटाळून रजनी माहेरी निघून गेली. ही संधी साधत प्रकाश याने २०१५ मध्ये पुणे येथील बी.कॉम. शिकलेल्या शिल्पा नावाच्या मुलीसोबत जवळीक साधली. तिला मी बीएसएनएलमध्ये क्लार्क असल्याचे सांगून लग्न केले. लग्नात हुंडा घेऊन रितसर शिल्पाला घरी घेऊन आला. काही दिवसातच तिच्या सोबतही त्याने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. शिल्पाही याच्या त्रासाला कंटाळून निघून गेली. 

प्रकाश याने पुन्हा २०१६ मध्ये जालना येथील सुरेखा रंगप्पा झारखंडे या मुलीशी जवळीक साधली व तिसरे लग्न केले. तिलाही प्रकाश याने काही दिवसात सासरहून पैसे आणण्याची मागणी करू लागला. सुरेखा  यांना दिवस गेल्यानंतर त्याने बाळाला जन्म देऊ नको म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरेखाही याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली. सुरेखा यांनी बाळाला जन्म दिला. तिन्ही बायका घरी नव्हत्या त्यामुळे प्रकाश जानगवळी हा बिनधास्त होता. 

समाजातील जागरुक व्यक्तीमुळे चौथा डाव फसला- तीन मुलींशी विवाह करून त्यांना पैशासाठी माहेरी हाकलून दिल्यानंतर प्रकाश जानगवळी हा पुन्हा चौथ्या पत्नीच्या शोधात होता. अशी एक मुलगी त्याने पसंत केली होती, तिच्यासोबत लग्न करण्याचा डाव आखला होता. यापूर्वी झालेले तीन लग्न लपवून तो चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्याचे स्वप्न पहात होता.  यासाठी त्याने जोरदार प्रयत्न सुरू केले होते.  या प्रयत्नात असतानाच त्याचा डाव उधळून लावण्यात आला. 

- हा प्रकार समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला समजला. या व्यक्तीने तिन्ही बायकांशी संपर्क साधून ही माहिती दिली. तिघींनी सोलापूर  गाठून प्रकाश जानगवळी याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी