शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राम मंदिर ना भाजपाचा, ना संघाचा मुद्दा, ती तर प्रत्येक हिंदूची भावना : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:21 PM

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम ...

ठळक मुद्देराज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत - महसूल मंत्रीराम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न - महसूल मंत्री

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम मंदिर हा ना भाजपचा मुद्दा आहे, ना राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा. तो प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. जो गुणाने हिंदू आहे, म्हणजे जो देशावर प्रेम करतो, इथल्या मातीवर प्रेम करतो तो मुसलमान हादेखील हिंदूच आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

बार्शी येथे सोमवारी आले असता, ते बोलत होते. महसूल मंत्री पाटील म्हणाले, राम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या माध्यमातून झाले तर गैर काय? शेवटी मंदिर होणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत. मात्र अद्याप शिवसेना-भाजपाच्या युतीचा निर्णय झाला नाही. ज्यांना जादा भीती वाटते, ते सर्वप्रकारची अ‍ॅडजेस्टमेंट करतात.

राज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत. २०१४ साली काँग्रेस-राष्टÑवादी विधानसभेला विरोधात लढले होते, त्याचा फटका त्यांना बसला. यावेळी आघाडी नाही झाली तर त्याचा फटका विशेषत: राष्टÑवादीला जादा बसेल. २०१४ साली राज्यात राष्टÑवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. आता मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास राष्टÑवादीचे १० आमदारसुद्धा येतील की नाही शंका आहे. या उलट काँग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत, असे सांगत राष्टÑवादीवर निशाणा साधला.

राज्यातील सेना नेते म्हणतात, सध्या शिवसेना व भाजपात ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो,’ अशा विचारांची व अहंमभावना असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांना सत्ता कोणाचीही येवो, त्याशी काही घेणे-देणे नाही. शेवटी शिवसेना काय? भाजपा किंवा अन्य राजकीय पक्ष काय, ही सारी माया आहे. मात्र भाजपा युतीसाठी प्रयत्नशील आहे. शेवटी जे ठरेल ते होईल. भाजपाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे राज्यात व देशात पक्ष बॅकफूटवर कधीही नव्हता, तो जाणार नाही, असा विश्वासही नामदार पाटील यांनी व्यक्त केला.

युती न झाल्यास स्वतंत्र लढूच्आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती झाली पाहिजे, असा भाजपाचा सद्यस्थितीत मूड असून, ज्या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपा दावा करणार नाही. उगाच जागा वाटपावरून भांडणे नकोत. मात्र युती झाली नाही, तर भाजपा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

बार्शी मंडळाचा दुष्काळात समावेश करूच्राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. बार्शी ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम मार्गी लावले. यासारख्या लोकहिताच्या कामांची मागणी बार्शीकरांनी केल्यास ती निश्चित पूर्ण करू. बार्शी शहर मंडळाचा समावेश दुष्काळी मंडळात करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी त्या संबंधीचा अहवाल पाठविल्यानंतर बार्शी मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करू, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस