शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रश्न पडण्याचाच प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:03 IST

खरंतर माणसाचं आयुष्य अवघं अनेक प्रश्नाचं भांडार आहे. जन्मापासून मरणापर्यंत खूप प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करता करता ...

ठळक मुद्देसोलापुरातील महानगरपालिका शाळा व विविध आश्रमशाळांतील जीवनात अनेक समस्या जन्मापासून मरणापर्यंत खूप प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हल्ली मुलं मोबाईल, टी.व्ही. व्हिडीओ गेम, चॅटिंग कार्टूनमध्ये हरवलीत वगैरे वगैरे शेरे मारुन मोकळे होतो

खरंतर माणसाचं आयुष्य अवघं अनेक प्रश्नाचं भांडार आहे. जन्मापासून मरणापर्यंत खूप प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करता करता नाकीनऊ येतात. काही प्रश्न सोडून दिल्याने सुटतात तर काही सोडवण्यावाचून पर्याय नसतो, तर काही प्रश्न नवीन असंख्य प्रश्न निर्माण करून सुटतात. काही प्रश्न ऊर्जा व प्रेरणादायी, संशोधन कार्यास प्रेरणा देतात.

आपण आज जे भौतिक साधनसुचितांचे लाभ घेत आहोत त्याचे शोध त्यावेळी कुणाला तरी पडलेल्या प्रश्नांची उकल निष्कर्ष आहे, हे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल. शिक्षणातून नवनवीन क्षितिजं कवेत घेताना मुलांमधील जिज्ञासा जागृत करणं अवघ्या व्यवस्थेचं कर्तव्य आहे.आमची शिक्षणपद्धती मुळात प्रश्नोत्तरावर अवलंबून आहे पण ती साचेबद्ध रेडिमेड इतकी की गाईडमधील उत्तर जसेच्या तसे लिहिले तरंच मार्क देणारे गुरुजी आहेत.

हल्ली मुलं विचार करत नाहीत फार चंचल आहेत. एका जागी बसत नाहीत. आमचं बालपण असं होतं,आम्ही असं शिकलो, किती अडचणी होत्या, कसले प्रश्न होते परिस्थितीचे तरीही आम्ही शिकलो. अगदी बरोबर आहे. समस्या होत्या, अडचणी होत्या म्हणून उत्तरं शोधण्याची गरज पडली आणि आपण त्यातून अनुभवातून शिकलो पण तेच आम्ही काय घोडचूक करत आहोत. याची आपल्यालाच कल्पना नाही.

हल्ली मुलं मोबाईल, टी.व्ही. व्हिडीओ गेम, चॅटिंग कार्टूनमध्ये हरवलीत वगैरे वगैरे शेरे मारुन मोकळे होतो. मुलांना खेळाला मैदाने आहेत ? घरात खरंच सुसंवाद किती होतो? आज किती शाळांचं वातावरण शिकण्याची गरज वा जिज्ञासा निर्माण होऊ शकेल असं आहे ? ज्या काही स्पर्धा होतात तिथं निकालाचं पावित्र्य असो की उत्तम खेळाडूची निवड करतानाचा प्रामाणिकपणा जोपासला जातो? या साºया प्रश्नांची उत्तरं अंतर्मुख होऊन शोधावी लागतील.आपण आणखी एक नेहमी  हल्ली मुलांना प्रश्नच पडत नाहीत असे म्हणतो. मुलं विचारच करत नाहीत असं बरंच काही म्हणतो पण हे अर्धसत्य आहे.

परवाच एका निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात शास्त्रज्ञ कसे घडतात? यावर मुलांशी संवाद साधताना फार छान अनुभव आला. माझ्यासमोर १७५ मुलं-मुली. त्यांच्याशी बोलता झालो. पूर्वी राजाला हवा द्यायची म्हटलं तर दोन माणसं लागायची आता बटणं थांबलं की आला वारा. किती सहज मिळतं सारं. चला आपणही जसा न्यूटनला प्रश्न पडला तसेच काही प्रश्न आपल्याला पडतात का ते पाहू या. पाच-सात मिनिटं त्यांना ध्यानमुद्रेत मौन अवस्थेत बसवलं व विचाराला प्रेरणा दिली. सारं वातावरण प्रसन्न ती निरागस मुलं साºया चित्तशक्ती एकवटून विचार करू लागली, विरामानंतर अनेकांना काही गवसल्याचा आनंद होता.अनेकांचे हात वर होते. काय विचार केला असेल? काय प्रश्न विचारतील ही मुलं असे प्रश्न माझ्यासह संयोजकांनाही पडले.

एकेक मुलं उठून विचारत होती. पहा मुलांनी किती विचार केला ते,आपण ऊस आडवा लावतो पण तो उभा का उगवतो? पतंग कीटक दिव्यावर झेप घेऊन का मरतो ? वटवाघूळ रात्रीच का घडतं ? पृथ्वीला पृथ्वी हे नाव कसं पडलं ? मोबाईल मध्ये कोणतं यंत्र आहे हे सारं आपण सहज वापरतो ? आपण आईला अरेतुरे व वडिलांना अहोजाहो का बोलतो ? असं का ? असे एक दोन नाही तर एवढ्या कमी वेळात तीस प्रश्न मुलांना पडले ? आणि ही मुलं कुठल्या हाय प्रोफाईल स्कूलची नव्हती तर उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, कवठे,तेलगाव, डोणगाव, बाणेगाव, प्रतापनगर, शिवणी, पाकणी,  सोलापुरातील महानगरपालिका शाळा व विविध आश्रमशाळांतील जीवनात अनेक समस्या पाठीशी बांधून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणारी ग्रामीण भागातील होती. अशा प्रश्नांची उत्तरे शोधणं म्हणजेच संशोधक होणं. नाही का ? म्हणून आज थोडं पालकांनी मुलांना घडवताना त्यांना सगळंच तुम्ही रेडिमेड देऊ नका.  त्यांना बाहेरचं जग पाहू दे ,माणसातील माणसं अनुभवू द्या. थोडंसं मानवतेच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहायची दृष्टी लाभली की मुलांना टक्केवारीच्या जोखडातून थोडं मुक्त करुन तर पहा तुमच्या पुढचेही अनेक प्रश्न विनासायास मिटतील. चला तर मग पाहू या एक प्रयत्न करून...- रवींद्र देशमुख(लेखक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण