शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

गरिबी; प्रेरणा की अडथळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:18 IST

उन्हाळ्याचे दिवस असावेत. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू झालेली. माझी गाडी शाळेच्या गेटच्या आत शिरली आणि मुलांचा एक घोळका माझ्या ...

ठळक मुद्दे संकटांपुढे कच खाण्यापेक्षा त्यांच्यावर स्वार होऊन पुढे जात राहणं हे केव्हाही श्रेयस्कर समोर अंधार असला तरी त्यापुढे उजेड असतो, यावर विश्वास असला की संघर्ष आणखी सुकर

उन्हाळ्याचे दिवस असावेत. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू झालेली. माझी गाडी शाळेच्या गेटच्या आत शिरली आणि मुलांचा एक घोळका माझ्या दिशेने धावत आला. ‘गुर्जी, आरज्यानं शाळा सोडून दिली.’ एकानं धापा टाकत खबर दिली. ‘तुमाला कुणी सांगितलं?’ ‘तोच म्हणला स्वता’, ‘बरं ठिकंय, बघतो मी. तुम्ही जा परिपाठाला. मुलांना कसंबसं पिटाळून लावलं. मी विचार करू लागलो.

र्जुनसारख्या मुलानं शाळा का सोडून दिली असावी? तसा तो रेग्युलर येणारा, अभ्यासू मुलगा. अशी कोणती परिस्थिती उद्भवली असावी त्याच्याबाबतीत? मी त्याच्या घरी गेलो. घरी अर्जुन नव्हताच. त्याची आई चुलीपुढे बसलेली. मी विचारल्यावर मला म्हणाली, ‘तेचा बा पेताडा हाय. घरात खायला आन न्हाय आन शाळा शिकून काय करायचं?’ मला धक्काच बसला. मी म्हटलं, ‘अर्जुनला कामाला लावलं तर तोही पुढे जाऊन त्याच्या वडिलांसारखाच होईल. त्याला कामाला लावणे हा उपाय नाही. उलट तुमची ही परिस्थिती पालटायची असेल तर त्याला शिकवा चांगलं. तो तुम्हाला बाहेर काढेल यातून..’ माझ्या बोलण्याचा त्या माऊलीवर बºयापैकी परिणाम झाला. दुसºया दिवशीपासून अर्जुन शाळेत पुन्हा येऊ लागला.

असे अनुभव खूपदा मला आले आहेत. परिस्थिती नाही म्हणून शाळा सोडून चरितार्थाला लागलेली लहान-लहान मुले मला दिसतात. खरं तर गरिबी ही शिक्षणाची प्रेरणा असायला हवी, पण तो शिक्षणातला अडथळा का बनतोय? मुलांना लहान वयातच चरितार्थाला लावण्याची मानसिकता का बळावत चाललीय? याच्याकडे कुणाचेच कसे लक्ष नाही. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचे ध्येय आपण स्वातंत्र्यापासून ठेवले आहे. पण ते अद्यापही साध्य झाले नाही. याचे कारण आपण प्रश्नांच्या मुळाशीच जायला तयार नाही.

मी लहान असताना आमच्या शेजारी एक काकू होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्याच्या उलट परिस्थिती आमची होती. दहा बाय दहाच्या भाडोत्री घरात आम्ही चार भावंडे व आई-वडील राहायचो. काकूचा मुलगा माझ्याच शाळेत शिकत होता. तो अभ्यासात फारच मागे असायचा. मी मात्र वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी होतो. काकू म्हणायच्या, ‘तुम्ही गरीब आहात म्हणूनच तुमची मुले हुशार आहेत, आमच्या मुलांना सगळं मिळतंय म्हणून त्यांना कशाचीच किंमत नाही. आज मी स्वत: पालक आहे आणि त्या काकूच्या वेदना अनुभवतो आहे. मुलांना सगळं वेळच्या वेळी मिळत गेलं की, त्याची किंमत कळत नाही हे अगदी खरं आहे. आयुष्यात संघर्ष वाट्याला आलाच पाहिजे. त्याशिवाय उन्नती होत नाही. जगभरातले अनेक महापुरुष संघर्षामुळेच घडले आहेत.

परिस्थितीला शरण जाऊन शिक्षणापासून दुरावलेली मुलं पाहिली की खूप दु:ख होतं. संकटांपुढे कच खाण्यापेक्षा त्यांच्यावर स्वार होऊन पुढे जात राहणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं. समोर अंधार असला तरी त्यापुढे उजेड असतो, यावर विश्वास असला की संघर्ष आणखी सुकर होतो. दरवर्षी आमच्या शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असतो. या दिवशी विद्यार्थी खूप भावुक होतात. शिक्षकांना भेटवस्तू आणतात, मी मात्र दरवर्षी त्यांना सांगतो, मला भेटवस्तू देऊ नका. मला भेटभीट यायचीच असेल तर एक करा. तुमच्यापैकी कोणीही किमान बारावीपर्यंत तरी शाळा सोडू नका. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल. मुले खूश होतात. काही जणांवर याचा अपेक्षित परिणामही होताना दिसतो.

समाजातही आज अनेक स्वयंसेवी संस्था या दिशेने प्रयत्न करताना दिसतात. ही निश्चितच आशादायी बाब आहे. आमच्यावेळी ही चळवळ क्षीण स्वरूपात होती. मला आठवतं, आमच्या शाळेत गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी नावाची योजना असायची. दरवर्षी वर्षाच्या शेवटी मुलांना आवाहन केले जायचे की, ज्यांच्याकडे कोºया वह्या शिल्लक आहेत त्यांनी त्या शाळेत जमा कराव्यात. अशा वह्यांची पाने काढून त्यांच्या नव्या वह्या तयार केल्या जायच्या. त्या गरीब विद्यार्थ्यांना वाटल्या जात असत. 

आज परिस्थिती बदलली आहे. आपणाला फक्त वस्तुदानाच्या स्वरूपात काम करून चालणार नाही. मानसिकता बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर, वीटभट्ट्यांवर काम करणारी असंख्य मुले दिसतात. त्यांच्यासाठी काम करणे हे आव्हानात्मक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शासन, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवी संस्थांची वज्रमूठ आवळणे काळाची गरज आहे.डॉ. प्रेमनाथ रामदासी, अकलूज(लेखक प्राथमिक शिक्षक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा