शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पालकांंनो सावध व्हा, बालकांनो शहाणं व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 2:03 PM

मी पाचवी-सहावीत असेन. शाळेला जाताना आई- बाबा कधीच पैसे द्यायचे नाहीत. मीच काय माझ्या कोणत्याच मैत्रिणीकडे पैसे नसायचे. कधीतरी ...

मी पाचवी-सहावीत असेन. शाळेला जाताना आई- बाबा कधीच पैसे द्यायचे नाहीत. मीच काय माझ्या कोणत्याच मैत्रिणीकडे पैसे नसायचे. कधीतरी चुकून कोणाकडे तरी एखादा रुपया निघायचा.

एकदा मला माझ्या मैत्रिणीला शाळेच्या मधल्या सुट्टीत बोरं विकणारी शाळेबाहेर दिसली. छोटी छोटी मस्त बोरं! त्याला आम्ही शेंबडी बोरं म्हणायचो. पाहिल्या पाहिल्या तोंडाला पाणी सुटलं. खाण्याचा प्रचंड मोह झाला. पण पैसे? आम्ही दोघी कंगाल. पण बोरं तर खायची होतीच. मग सरळ आम्ही त्या बाईकडे गेलो आणि निर्लज्जपणे म्हणालो ‘ ओ आज्जी थोडी बोरं द्या की,पण आमच्याकडे काहीच पैसे नाहीत.’ हे ऐकल्यावर एकदा-दोनदा हाकललं पण काय कुणास ठाऊक परत बोलावून आमची चिमुकली ओंजळ उतू जाईल इतकी बोरं दिली आणि आम्ही जणू बोराची अख्खी बागच जिंकल्याच्या आनंदात तिथून निघालो. 

हा तसा त्या वयातला निरागसपणा, बावळटपणा आठवला की जाम हसू येतं आज. पण आज या वयातल्या मुलांना नको तितकं शहाणं पाहून आमच्या बावळटपणाचं सच्चा वाटायला लागतो. ज्यात कसलाही दिखावूपणा नाही. काही नकली नाही. जे आहे, जसं आहे तसं आनंदानं स्वीकारल्याच्या खुणा. त्या वेळच्या बालपणात दिसतात आणि आज उसवलेपण झाकून, छोटासा मखमली तुकडाच सगळीकडे मिरवण्याचा आटापिटा केला जातोय. असं वाटत राहतं.

आजच्या लहान मुलांचं अटीट्यूड, त्यांचे कपडे, शूजच्या निवडीतला ठामपणा, मुलीचा मेकअपचा सेन्स, आपल्या दिसण्याचा अतिविचार, सोशल मीडियातलं गुरफटणं. प्रेम, सेक्स याविषयी लहान वयातलं आकर्षण आणि नको तितकी माहिती इत्यादी.  हे असं सारं समोर पाहताना आश्चर्य आणि भीती दोन्ही उभ्या ठाकतात. बºयाचदा पालक आर्थिक परिस्थिती बेताची नसली तरी  मुलांना साºया सुख-सुविधा देण्यासाठी रक्ताचं पाणी करतात. पुढे मुलांनाही आपल्या हट्टांना मंजुरी मिळवल्याशिवाय चैन पडत नाही. यामध्ये पालकांना या गोष्टीचं समाधान असतं की, जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतोय. पण समाधानाच्या पायात एक मोठी गोष्ट मुलांना द्यायची राहूनच जाते आणि ती म्हणजे त्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी त्यांना आलेले अनुभव! ते आपल्या मुलांना अशा कुठल्या अनुभवांना भीडू देत नाहीत. त्यांची जडण-घडण, त्यांंचं कष्ट, त्यांच्या अडचणी, अडचणीतून त्यांनी शोधलेले पर्याय, संकटांवर केलेली मात. या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. या अनुभवांपासून ते अनभिज्ञच राहतात. पालक स्वत:च मुलांचे कवच बनून प्रत्येक घाव झेलत राहतात. मग काय मुलांना आयुष्य गोड गोडच वाटायला लागतं.

आयुष्याची दुसरी चव चाखलीच जात नाही आणि मग जेव्हा बोर्डात मार्क कमी पडतात, हवे तिचे अ‍ॅडमिशन मिळत नाही तर कधी कधी माझ्या फोटोला फ. बी. (फेसबुक) वर लाईक मिळत नाही ही सुद्धा मोठी समस्या बनते. अशा अडचणी निर्माण होतात. तेव्हा हे अडथळे  साक्षात पर्वताएवढ्या उंचीचे भासतात. आधी कधी साधी पठारं, डोंगरं सुद्धा वाटेत आलेली नसतात आणि थेट सामना पर्वताशी म्हटलं की, गांगरायला होतं. या वयातही पालकांचाही पवित्रा बदललेला असतो. ते म्हणतात, ‘ आता मोठा झाला आहेस तू. निस्तर  तूच सगळं.’ मग सारंच जीवघेणं वाटतं. डिप्रेशन तर दबा धरुन बसलेलंच असतं. ते लगेच येतं. अस्वस्थ मन भरकटतं. मेन ट्रॅकपासून लांब जायला लागतं. 

या भरकटण्याची पाळमुळं ज्या बालपणात दडलेली आहेत, तिथूनच सावध होणं गरजेचं आहे. असं वाटतं.  त्या वयात येणारा थोडासा अभाव पुढे भरीव यश देणारा ठरतो. स्वत:चं असणं, दिसणं, स्वीकारणं, प्रत्यक्षात हातातल्या  बाबींचा, वास्तवाचा परिचय होणं हे आपल्याला आपली कुवत आणि क्षमता यांची जाणीव करुन देतं. स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीला आणि स्वत:चं अस्तित्व उभं करण्याच्या प्रयत्नांना तिथूनच सुरुवात होते. जी पुढच्या वाटेतल्या पर्वतांना लहान करत जाते आणि तुम्हाला मोठं करत राहते. - प्रा. ममता बोल्ली(लेखिका सृजनशील युवा कवयित्री अन् साहित्यिक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरchildren's dayबालदिनEducationशिक्षणSocialसामाजिक