शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘विठ्ठला’च्या भेटीला येणाऱ्या रेल्वेमार्गाचा कागदी प्रवास अद्याप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST

भाग -१ माळशिरस : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित इंग्रजकालीन सर्व्हे झालेला लोणंद-पंढरपूर मार्गाच्या मंजुरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होऊन दोन वर्षे उलटली. ...

भाग -१

माळशिरस : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित इंग्रजकालीन सर्व्हे झालेला लोणंद-पंढरपूर मार्गाच्या मंजुरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होऊन दोन वर्षे उलटली. तर स्वातंत्र्यानंतरही सुमारे ७३ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या विकासाच्या जाहिरनाम्यातही या मार्गाचे नाव हमखास सामाविष्ट केले जाते. मंजुरी, सर्व्हे, फेरसर्व्हे अशा बातम्यांमुळे सध्या तरी यातील फलटण-पंढरपूर रेल्वेची चर्चा रुळावर येत आहे. मात्र अद्यापही बहुप्रतीक्षीत ‘विठ्ठल एक्स्प्रेस’ कागदाच्या रुळावर अटकून राहिली आहे. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘विठ्ठला’च्या भेटीला येणाऱ्या रेल्वे मार्गावरील कागदी प्रवास अद्याप सुरूच आहे.

लोणंद-पंढरपूर या रेल्वेमार्गाचा १९०८ मध्ये इंग्रज सरकारणे सर्व्हे केला होता, तर १९१८ मध्ये मंजूर झाला. या जमिनीच्या सातबारा व ८-अ च्या उताऱ्यावर रेल्वे विभाग भारत सरकार असा शेरा येऊ लागला. २००८ साली पुन्हा फेरसर्व्हे करण्यात आला.

सध्या लोणंद ते फलटण मार्ग तयार झाला आहे. त्यामुळे आता फलटण-पंढरपूर १०५ कि.मी. अंतराचा मार्ग करावा लागणार आहे. यात लहान-मोठी १७ स्थानके आहेत. यासाठी ६२५ हेक्टर भूसंपादन झाले आहे. मात्र आणखी १२८ हेक्टरची आवश्यकता असताना सध्या पुन्हा नव्या मार्गाचा सर्व्हे सुरू झाला आहे. या संबंधातील आकडेवारी सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

रेल्वेचा कागदावरचा प्रवास

१९१८ ला मंजूर झालेल्या मार्गासाठी तब्बल ९९ वर्षांनी म्हणजे २०१७मध्ये या मार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकालात ११४९ कोटी रुपये निधी मंजूर झाला. पहिल्या वर्षी १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला. यानंतर प्रतीवर्षी दहा कोटी रुपये रक्कम बजेटमध्ये सामाविष्ट केली आहे. २०२० मध्ये या मार्गासाठी लागणाऱ्या खर्चाचा ५० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, यासाठी केंद्राचा राज्याला पत्रव्यवहार झाला. २०२१ मध्ये पुन्हा या मार्गाचा नव्याने सर्व्हे सुरू झालेला दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीला येणाऱ्या रेल्वे मार्गावरील कागदी प्रवास अद्याप सुरूच आहे.

---

लोणंद-पंढरपूर रेल्वे हा एक थट्टेचा विषय झाला आहे. या पट्ट्यातून दिग्गज नेत्यांनी राज्यात व केंद्रात प्रतिनिधित्व केले आहे. मात्र या मार्गाचा वापर निवडणुकीत दाखवायला गाजर म्हणून केला जातो. पक्ष, संघटना, नेते यांच्या विकासाच्या संकल्पना नेमक्या काय? असाव्यात? सर्वे झालेला रेल्वेमार्ग शंभर वर्षांहून अधिक रेंगाळतो, यापेक्षा या भागाचे दुर्दैव काय?

- उपेंद्र केसकर

अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत