शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

‘विठ्ठला’च्या भेटीला येणाऱ्या रेल्वेमार्गाचा कागदी प्रवास अद्याप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST

भाग -१ माळशिरस : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित इंग्रजकालीन सर्व्हे झालेला लोणंद-पंढरपूर मार्गाच्या मंजुरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होऊन दोन वर्षे उलटली. ...

भाग -१

माळशिरस : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित इंग्रजकालीन सर्व्हे झालेला लोणंद-पंढरपूर मार्गाच्या मंजुरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होऊन दोन वर्षे उलटली. तर स्वातंत्र्यानंतरही सुमारे ७३ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या विकासाच्या जाहिरनाम्यातही या मार्गाचे नाव हमखास सामाविष्ट केले जाते. मंजुरी, सर्व्हे, फेरसर्व्हे अशा बातम्यांमुळे सध्या तरी यातील फलटण-पंढरपूर रेल्वेची चर्चा रुळावर येत आहे. मात्र अद्यापही बहुप्रतीक्षीत ‘विठ्ठल एक्स्प्रेस’ कागदाच्या रुळावर अटकून राहिली आहे. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘विठ्ठला’च्या भेटीला येणाऱ्या रेल्वे मार्गावरील कागदी प्रवास अद्याप सुरूच आहे.

लोणंद-पंढरपूर या रेल्वेमार्गाचा १९०८ मध्ये इंग्रज सरकारणे सर्व्हे केला होता, तर १९१८ मध्ये मंजूर झाला. या जमिनीच्या सातबारा व ८-अ च्या उताऱ्यावर रेल्वे विभाग भारत सरकार असा शेरा येऊ लागला. २००८ साली पुन्हा फेरसर्व्हे करण्यात आला.

सध्या लोणंद ते फलटण मार्ग तयार झाला आहे. त्यामुळे आता फलटण-पंढरपूर १०५ कि.मी. अंतराचा मार्ग करावा लागणार आहे. यात लहान-मोठी १७ स्थानके आहेत. यासाठी ६२५ हेक्टर भूसंपादन झाले आहे. मात्र आणखी १२८ हेक्टरची आवश्यकता असताना सध्या पुन्हा नव्या मार्गाचा सर्व्हे सुरू झाला आहे. या संबंधातील आकडेवारी सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

रेल्वेचा कागदावरचा प्रवास

१९१८ ला मंजूर झालेल्या मार्गासाठी तब्बल ९९ वर्षांनी म्हणजे २०१७मध्ये या मार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकालात ११४९ कोटी रुपये निधी मंजूर झाला. पहिल्या वर्षी १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला. यानंतर प्रतीवर्षी दहा कोटी रुपये रक्कम बजेटमध्ये सामाविष्ट केली आहे. २०२० मध्ये या मार्गासाठी लागणाऱ्या खर्चाचा ५० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, यासाठी केंद्राचा राज्याला पत्रव्यवहार झाला. २०२१ मध्ये पुन्हा या मार्गाचा नव्याने सर्व्हे सुरू झालेला दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीला येणाऱ्या रेल्वे मार्गावरील कागदी प्रवास अद्याप सुरूच आहे.

---

लोणंद-पंढरपूर रेल्वे हा एक थट्टेचा विषय झाला आहे. या पट्ट्यातून दिग्गज नेत्यांनी राज्यात व केंद्रात प्रतिनिधित्व केले आहे. मात्र या मार्गाचा वापर निवडणुकीत दाखवायला गाजर म्हणून केला जातो. पक्ष, संघटना, नेते यांच्या विकासाच्या संकल्पना नेमक्या काय? असाव्यात? सर्वे झालेला रेल्वेमार्ग शंभर वर्षांहून अधिक रेंगाळतो, यापेक्षा या भागाचे दुर्दैव काय?

- उपेंद्र केसकर

अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत