शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

महाआघाडीतल्या एका पक्षाकडून पूरग्रस्तांच्या मदतीला विरोध; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:44 AM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

ठळक मुद्दे२५ आॅक्टोबरला ऊसतोड कामगारांचा मेळावापूरग्रस्तांना तत्काळ पाच हजार रुपये द्यापूरग्रस्त शेतकºयांना सरसकट खावटी मदत दोन दिवसात द्यावी

सोलापूर : महाआघाडीतला एक पक्ष सहकार क्षेत्रावर वर्चस्व राखून आहे. त्याच हितसंबंधातून साखर कारखानदारांना अनुदान देण्यासाठी हा पक्ष तयारी करतोय. त्यामुळे सध्या राज्यभरातील पूरग्रस्तांना मदत मिळू नये. अनुदान मिळू नये, याकरिता महाआघाडीतला हा पक्ष त्यांच्या मित्र पक्षांवर दबाव टाकतोय, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

त्यांचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होता. राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता त्यांनी पूरग्रस्तांच्या विरोधात दबाव टाकणाºया तसेच सहकार हित जोपासणाºया राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केला. सोलापूर जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूर आला आहे. पूरग्रस्त गावांच्या भेटीकरिता डॉ. आंबेडकर हे मंगळवारी सोलापूर दौºयावर होते. दरम्यान, त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. महाराष्ट्रातले हे सरकार तीन पायांवर चालणारे सरकार आहे. त्यातील एक पाय इतर दोन पायांवर दबाव टाकतोय. पूरग्रस्त शेतकºयांना अनुदान मिळू नये, यासाठी तो प्रयत्न करतोय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

डॉ. आंबेडकर म्हणाले, तीन पायांवर चालणाºया या सरकारात ताळमेळ नाही. त्यामुळेच पूरग्रस्तांना मदत करण्याच्या विषयावर अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यसनी आहेत, ते देश विकायला चाललेत. त्यांची अवस्था एका दारुड्याप्रमाणे झाली आहे.----------पूरग्रस्तांना तत्काळ पाच हजार रुपये द्याआपत्तीकाळात शेतक?्यांना खावटी मदत देण्याची शासकीय पद्धत कार्यरत आहे. ज्या पूरग्रस्त शेतक?्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना शासनाकडून महिनाभर पुरेल इतकं चांगलं धान्य, कपडे, भांडीकुंडी तसेच पाच हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम तत्काळ मदत देण्याची पद्धत आहे. राज्यातील सर्व पूरग्रस्त शेतकºयांना सरसकट खावटी मदत दोन दिवसात द्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

२५ आॅक्टोबरला ऊसतोड कामगारांचा मेळावा२५ आॅक्टोबरला बीड येथील भगवानगड पायथ्याशी ऊसतोड कामगार, मुकादम तसेच कमिशन एजंट यांचा जाहीर मेळावा घेत आहोत. पाच वर्षांपूर्वी सरकारसोबत ऊसतोड कामगारांचा करार झाला होता. करार संपला असून नवीन करार व्हायला पाहिजे. त्याकरिता हा मेळावा आयोजित केला आहे. ७ कामगार संघटनांचा यात सहभाग आहे. जाहीर मेळाव्याचे नेतृत्व मी करतोय. नवीन करार झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही; अन्यथा कामगार संपावर जाणार आहेत, अशी माहिती यावेळी आंबेडकर यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण