शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

‘ऑनलाईन’मुळे वर्गात बसायची सवयच गेली ; मग कारण सांगून विद्यार्थी पडतात बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 12:58 IST

पाणी पिणे अन् ‘शू’चे सांगतात कारण : खेळायचे तासाबद्दल सर्वात जास्त प्रश्न

सोलापूर : अनेक दिवसानंतर विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत. पण, अनेक विद्यार्थ्यांची सवय मोडल्यामुळे प्रत्येक तासानंतर बाहेर जाण्यासाठी विद्यार्थी शू व पाणी पिण्याचे कारण देत वर्गाबाहेर पडत आहेत. आणि एक विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर बाहेर जाण्यासाठी रांगा लागतात, असा अनुभव शिक्षकांना येत आहे.

चार ऑक्टोबरपासून शहरामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. पण, अनेक दिवसानंतर शाळेत येत असल्यामुळे मुले शाळा भरण्याच्या आगोदरच शाळेत थांबत आहेत. तसेच वर्ग जरी भरत असले तरी पिटीचे तास आणि खेळाचे तास कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे.

तसेच, मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थी मोबाईल घेऊन घरात फिरत अभ्यास करत होते. पण, वर्गात आल्यानंतर एका तासापर्यंत विद्यार्थ्यांचे वर्गात लक्ष राहते, त्यानंतरच त्यांची चुळबुळ सुरू होते. पण, आता विद्यार्थ्यांना सवय होत आहे. असे शिक्षकांचे मत आहे.

वर्गात जागा बदलता येत नाही

कोरोना विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती असून विद्यार्थी हे नियम पाळत असतात. तसेच वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. पण पूर्वी कंटाळा आल्यानंतर विद्यार्थी बेंच बदलत होते. पण, आता ही संधी नसल्यामुळे वर्गात चुळबुळ सुरू असते.

वर्गात जागा बदलता येत नाही

कोरोना विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती असून विद्यार्थी हे नियम पाळत असतात. तसेच वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था फिक्स करण्यात आली आहे. पण पूर्वी कंटाळा आल्यानंतर विद्यार्थी बेंच बदलत होते. पण, आता ही संधी नसल्यामुळे वर्गात चुळबुळ सुरू असते.

लिहिण्याची अडचण

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय कमी होत होती. यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय ठेवण्यास सांगण्यात येत होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वर्गात लिहिण्याचा वेग चांगला होता. असे असले तरी पूर्वीच्या तुलनेत हा वेग खूप कमी झाला आहे. तर, काही विद्यार्थ्यांना जोडाक्षरे लिहिताना अडचण येत होती, तर काही विद्यार्थ्यांना गणिताची आकडेमोड जमत नसल्याचे काही शिक्षकांचे मत आहे.

-------

कोरोनाच्या नियमांमुळे एकाच ठिकाणी बसावे लागत असून याची सवय नसल्याने सतत अवघडल्यासारखे आहे. पाय सतत मोकळे करावेसे वाटत आहे. पण, याचीही परत नक्की सवय होईल. पण, शाळा चालू झाल्यामुळे आम्ही विद्यार्थी आनंदी आहोत.

समृद्धी पाचकुडवे, विद्यार्थिनी

दोन वर्षे आम्ही विद्यार्थी एका वेगळ्याच तंत्रज्ञानाच्या युगात वावरत होतो. सुरुवातीला खूप चांगले वाटले, सर्व शिक्षक छोट्याशा मोबाईलमध्ये दिसत होते. परंतु नंतर आम्हाला या मोबाईलचा कंटाळा आला होता. पण, आता पुन्हा फळ्यावर शिकवलेले चांगले वाटत आहे. सवय नसल्यामुळे थोडा त्रास होत आहे. पण, आम्ही सवय करुन घेऊ.

मिहिर भाटवडेकर, विद्यार्थी

मोबाईलमधून शिकण्याचा मला कंटाळा आला होता. शाळा सुरू झाल्याने शिक्षकांना अनेक दिवसानंतर पाहता आले. तसेच सवय नसल्यामुळे अक्षरे अस्वच्छ येत आहेत. पण, शिक्षकही समजून घेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत.

मृणाल कांबळे, विद्यार्थिनी

शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी तर, प्रचंड खूश आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा अभ्यासाचा सराव थोडासा कमी झाला आहे. एका ठिकाणी बसण्याची विद्यार्थ्यांची सवय थोडीफार मोडली असल्या कारणाने ते तासातासाला वर्गात थोडेसे अस्वस्थ होतात. वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी कारण शोधतात.

- दीप्ती इंगळे-सिद्धम, शिक्षिका

 

 

मुले आता मित्रांमध्ये मिसळत आहेत. यामुळे अनेक मुलांचे मोबाईलचे वेड कमी झाले आहे, असे काही पालकांचे मत आहे. शाळा सुरू झाल्यामुळे पालकांवरील अर्धा ताण कमी झाला आहे. तसेच मुलांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत आहे. विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग मात्र थोडा कमी झाला आहे.

- अंबादास पांढरे, प्राचार्य

 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या