शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

मुलाखत ; एफआरपीपेक्षा जादा दर हा सरकारचा प्रश्न नाही : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:39 IST

सोलापूर : एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे़, पण तो सरकारचा प्रश्न येत ...

सोलापूर : एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे़, पण तो सरकारचा प्रश्न येत नाही असे स्पष्टीकरण राज्याचे सहकार,पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरूवात झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दराचा तिढा कायम आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत शासनाची असलेली भूमिका याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : ऊसदराबाबतच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत काय सांगाल ?सहकारमंत्री : केंद्र व राज्य सरकारने ठरविलेल्या एफआरपीप्रमाणे दर देणे हे सर्व साखर कारखानदारांना बंधनकारक आहे़  एफआरपीपेक्षा जादा दर देणे कोणत्या कारखान्याला परवडत असेल तर त्यांना तसा दर देण्याबाबत परवानगी दिली जाईल. नव्याने सुरू झालेल्या खाजगी कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देणे शक्य शक्य होत असेल, पण सहकारी कारखान्यांवरचा इनकम टॅक्स व इतर भार पाहिला तर सध्याच्या स्थितीत हे शक्य होणार नाही असे चित्र आहे. 

प्रश्न : गुजरात पॅटर्नप्रमाणे ऊसबिल देणे शक्य आहे का ?सहकारमंत्री :  ऊस घातल्यानंतर साखर कारखाने तीन हप्त्यात बिल देतात. गुजरात पॅटर्नप्रमाणे साखर कारखान्यांनी ऊसबिल १४ दिवसाच्या आत एकदाच द्यावे अशी शेतकºयांची मागणी आहे. मात्र कारखानदारांची परिस्थिती पाहता हे शक्य नाही़  उत्पादित साखरेला लगेच बाजारपेठ मिळत नाही़  त्यामुळे एफआरपी व उसबील वाटपाच्या मागणीबाबत शेतकरी व साखर कारखाना या दोघांचेही हित पाहणे गरजेचे आहे.

प्रश्न :  मागील एफआरपी थकीत असल्यामुळे चालू गळीत हंगामात किती कारखान्यांना गाळप परवाना दिला ?सहकारमंत्री :  गेले दोन दिवस दिवाळी सुटी असल्याने नवीन माहिती हाती आलेली नाही. पण सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर व मातोश्री साखर कारखान्यांबाबत तक्रार होती, चौकशी केली असता मातोश्रीने बिले वाटप केले आहे तर सिध्देश्वरला कर्ज मिळाले आहे. सिध्द्धेश्वर साखर कारखान्याकडून सोमवारपासून बिल वाटप करण्यात येणार आहे.

प्रश्न : ऊस दराबाबत शासनाची काय भूमिका असेल ?सहकारमंत्री :  उस दराबाबत शेतकºयांच्या मागणीला प्राधान्य दिले आहे़ पण शेतकºयांच्या हिताबरोबर साखर कारखानदारी टिकली पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकºयांच्या पेमेंटला प्राधान्य दिले पाहिजे, पण कारखानदारांना साखर उत्पादीत केल्यावर लगेच उचल मिळत नाही. प्रत्येक कारखानदार आप आपल्यापरीने बिल देत आहे. ज्या कारखान्यांनी बिल थकविले आहे, त्यांची माहिती घेतली जाईल.  

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी