शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

मुलाखत ; एफआरपीपेक्षा जादा दर हा सरकारचा प्रश्न नाही : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:39 IST

सोलापूर : एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे़, पण तो सरकारचा प्रश्न येत ...

सोलापूर : एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे़, पण तो सरकारचा प्रश्न येत नाही असे स्पष्टीकरण राज्याचे सहकार,पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरूवात झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दराचा तिढा कायम आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत शासनाची असलेली भूमिका याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : ऊसदराबाबतच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत काय सांगाल ?सहकारमंत्री : केंद्र व राज्य सरकारने ठरविलेल्या एफआरपीप्रमाणे दर देणे हे सर्व साखर कारखानदारांना बंधनकारक आहे़  एफआरपीपेक्षा जादा दर देणे कोणत्या कारखान्याला परवडत असेल तर त्यांना तसा दर देण्याबाबत परवानगी दिली जाईल. नव्याने सुरू झालेल्या खाजगी कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देणे शक्य शक्य होत असेल, पण सहकारी कारखान्यांवरचा इनकम टॅक्स व इतर भार पाहिला तर सध्याच्या स्थितीत हे शक्य होणार नाही असे चित्र आहे. 

प्रश्न : गुजरात पॅटर्नप्रमाणे ऊसबिल देणे शक्य आहे का ?सहकारमंत्री :  ऊस घातल्यानंतर साखर कारखाने तीन हप्त्यात बिल देतात. गुजरात पॅटर्नप्रमाणे साखर कारखान्यांनी ऊसबिल १४ दिवसाच्या आत एकदाच द्यावे अशी शेतकºयांची मागणी आहे. मात्र कारखानदारांची परिस्थिती पाहता हे शक्य नाही़  उत्पादित साखरेला लगेच बाजारपेठ मिळत नाही़  त्यामुळे एफआरपी व उसबील वाटपाच्या मागणीबाबत शेतकरी व साखर कारखाना या दोघांचेही हित पाहणे गरजेचे आहे.

प्रश्न :  मागील एफआरपी थकीत असल्यामुळे चालू गळीत हंगामात किती कारखान्यांना गाळप परवाना दिला ?सहकारमंत्री :  गेले दोन दिवस दिवाळी सुटी असल्याने नवीन माहिती हाती आलेली नाही. पण सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर व मातोश्री साखर कारखान्यांबाबत तक्रार होती, चौकशी केली असता मातोश्रीने बिले वाटप केले आहे तर सिध्देश्वरला कर्ज मिळाले आहे. सिध्द्धेश्वर साखर कारखान्याकडून सोमवारपासून बिल वाटप करण्यात येणार आहे.

प्रश्न : ऊस दराबाबत शासनाची काय भूमिका असेल ?सहकारमंत्री :  उस दराबाबत शेतकºयांच्या मागणीला प्राधान्य दिले आहे़ पण शेतकºयांच्या हिताबरोबर साखर कारखानदारी टिकली पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकºयांच्या पेमेंटला प्राधान्य दिले पाहिजे, पण कारखानदारांना साखर उत्पादीत केल्यावर लगेच उचल मिळत नाही. प्रत्येक कारखानदार आप आपल्यापरीने बिल देत आहे. ज्या कारखान्यांनी बिल थकविले आहे, त्यांची माहिती घेतली जाईल.  

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी