शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह केला; ५० हजारांचे काय; वर्ष सरलं तरी अनुदानच  मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2022 16:09 IST

सोलापूर : राज्य सरकारच्या समाजिक न्याय विभागामार्फत १९५८ पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबवण्यात येत ...

सोलापूर : राज्य सरकारच्या समाजिक न्याय विभागामार्फत १९५८ पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबवण्यात येत आहे. मात्र, लग्न होऊन एका वर्षापेक्षा जास्त वेळ झाला तरी १५३ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळालेच नाही.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौद्ध, विशेष मागासप्रवर्ग यापैकी एका व्यक्तीने सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शिख या व्यक्तींशी विवाह केल्यास अथवा दोन वेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींनी विवाह केल्यास प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना आहे. जातीभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने आर्थिक साहाय्य योजना सुरू केली. या योजनेचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे.

अर्थसाहाय्यासाठी जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १०२ जणांनी अर्ज केला होता. प्रत्येकी जोडप्याचे ५० हजार प्रमाणे ५१ लाख रुपये अजूनही आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मिळाले नाहीत. २०२१-२२ या वर्षात १५३ जोडप्यांनी अर्थसाहाय्यासाठी अर्ज केला आहे. साधारणपणे वर्षातून दोनदा मार्च आणि ऑक्टोबरमध्ये निधी मिळतो. हा निधी प्रत्येक जोडप्याला देण्यात येतो. कोरोनामुळे हा निधी येण्यास अडचण निर्माण झाली आहे.

समाजामधील अस्पृश्यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाह करून शासनाच्या प्रोत्साहन योजनेचा सुद्धा मोठ्या संख्येने जोडपी लाभ घेत असल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे या योजनेच्या दृष्टीने सकारात्मकता वाढत आहे.

-------

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्यांना ५० हजार

या योजनेंतर्गत जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपये तर २०१० पूर्वी विवाह झाला असेल आणि त्या जोडप्याने या योजनेचा अद्याप लाभ घेतलेला नसल्यास त्या जोडप्याला १५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. यातील ५० टक्के रक्कम केंद्र व उर्वरित ५० टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. सुरुवातीच्या काळात १५ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जात होते. त्यानंतर यात वाढ करून ५० हजाराचे अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली.

---------

ही लागतात कागदपत्रे

वधू-वराचे जातीचे दाखले, विवाह नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दोघांचे रहिवास दाखले, विवाहाचे प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, संयुक्त बँक खाते क्रमांक, विवाहाचा फोटो, दोन प्रतिष्ठितांची शिफारसपत्र अशी कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागास अर्ज केल्यानंतर शासनाकडून साधारण वर्षभरात हे अनुदान मिळते.

------------

निधी नसल्याने अडचणी ?

जाती व धर्मांच्या भक्कम भिंतींना ओलांडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या धाडसी तरूण दाम्पत्यांना अनेकदा कुटुंबातून बेदखल केले जाते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासते. परंतु, शासनाची योजनाही कागदावरच उरल्याने अशा जोडप्यांना संसाराची घडी बसवणे अवघड बनले आहे, असे एका जोडप्याने सांगितले.

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय