अकलूज : येथील सुनील ट्रेडिंग कंपनीचे मालक जितेंद्र शांतीलाल गांधी यांचे वेळापूर येथे अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४५ होते.गांधी हे अकलूजहून पंढरपूरकडे स्वत:च्या (एम. एच. ४५/ ए. २२११) या कारने जात होते. वेळापूर येथून २ कि.मी. अंतरावर असलेल्या पुणे-पंढरपूर रोडवरील खडी के्रशरजवळ असलेल्या झाडाला जोराची धडक लागून त्यामध्ये गांधी हे जागीच मरण पावले. अपघाताची माहिती मिळताच तालुक्यातील कृषी केंद्रे बंद ठेवली. या अपघाताची नोंद अकलूज पोलीस ठाण्यात करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}