शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

पत्नी देवाघरी गेली हे पतीला कळालेच नाही; तो दोन दिवस मृत पत्नीशी करत होता संवाद...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:30 AM

कोरोना संकट : मुलगा अंत्ययात्रेलाही पोहचू शकला नाही...

ठळक मुद्देसोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरातील घटनाया घटनेची माहिती मिळतात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखलया घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली हळहळ

रुपेश हेळवे

सोलापूर : जुळे सोलापूरात एक वयोवृध्द जोडपे राहत होते. पत्नीही गेल्या अनेक वर्षापासून आजारी होती, तर पतीचे वय ही जवळपास ७८ वर्षे होते. त्यांना दोन मुले आहेत. ते दोन्ही मुले हे लॉकडाऊनमुळे सोलापूरच्या बाहेर अडकले होते. दरम्यान, दोन दिवसापुर्वी पत्नीचा जीव गेला, पण हे वयोवृध्द पतीला कळालेच नाही. तो आपल्या पत्नीकडे जाऊन म्हणत होता तुला बरं वाटत नसेल तर तु झोप, आराम कर... जेव्हा परिसरात दुर्गंधी पसरली तेव्हा शेजाºयांनी पोलीसांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली, पण लॉकडाऊनमुळे अडकलेला एक मुलगा आईच्या अंत्ययात्रेलाही येऊ शकला नाही.

जुळे सोलापूरात एक ६३ वर्षाची महिला आणि ७८ वर्षाचे पुरूष असे जोडपे राहत होते, महिला ही गेल्या अनेक दिवसापासून आजारी होती, तर पतीचे वय झाल्यामुळे त्यांना दिसण्याबरोबरच ऐकण्याची, वास घेण्याची क्षमता ही कमी झाले होते, त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा मुंबईमध्ये वकीली व्यवसाय करतो तर दुसरा मुलगा सोलापूरात व्यवसाय करत दुसºया ठिकाणी राहत आहे.पण दोन्ही मुले हे आपल्या आई वडीलांची नेहमी काळजी करत असत. आईवडीलांच्या सेवेसाठी एक महिला होती. बुधवार १५ एप्रिल रोजी ही घरकाम करणारी महिला पुढील दोन दिवस कामासाठी येणार नाही असे सांगून तिने सुट्टी घेतली, त्यानंतर ती महिला कामासाठी आलीच नाही, याच दरम्यान (बुधवारी सायंकाळी किंवा गुरूवारी) आजारी असलेली महिला ही बेडवरून खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. पण पती हे वयोवृध्द असल्यामुळे आपली पत्नी खाली पडली. त्यात ती जखमी झाली. हे पतीला कळालेच नाही. ते पत्नीच्या रुम मध्ये गेल्यावर पत्नीला म्हणत, तुला बरं वाटतं नाहीय का , मी मुलाला सांगितले आहे. तो डॉक्टरांना पाठवून देईल. तुला लगेच बरे वाटेल़ असे म्हणून जात होते, अशी माहिती पोलीसांनी दिली, आपल्या पत्नीचा मृत्यू होऊन एक-दोन दिवस झाले आहे हे त्यांना कळलेच नाही.पण एक-दोन दिवस झाल्यानंतर म्हणजेच गुरूवार सायंकाळपासूनच परीसरात दुर्गंधी पसरली. यामुळे परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांना परिसरात दुर्गंधी पसरल्याची माहिती दिली. तेव्हा जुळे सोलापूर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी प्रकाश पवार, कपिल जवळे, मिथुन चव्हाण हे घटनास्थळी पोहचले, आणि घरात जाऊन पाहिले असता ही घटना उजेडात आली.तेव्हा पोलिसांनी दोन्ही मुलांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पण लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मुलांना सोलापुरात येता येईना. कसेबसे प्रयत्न करून एक मुलगा सोलापुरात दाखल झाला. दुसरा मुलगा परवानगी घेऊन दुचाकीवरून सोलापूर गाठले. पण त्याला सोलापूरला येण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीर होणार होता, यामुळे मुलाने आपल्या काळजावर दगड ठेवत आईच्या अंत्यविधी उरकण्यास आपल्या भावाला सांगितले. भावाने सांंगितल्याप्रमाणे आईचा अंत्यविधी एकाच मुलाच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री करण्यात आले. ही घटना जेव्हा परिसरात कळली तेव्हा नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होते.---------------------------------मुले दिवसातुन चार वेळा करत होते फोन.आपले आईवडील एकटेच आहेत. यामुळे त्यांच्या काळजीसाठी मुलांनी महिला कर्मचारी नेमले होते. ती महिला दररोज येऊन काम करत होते, याच बरोबर आईवडीलांची विचार पुस करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांची ही वेळोवेळी पाठवत होते़ याच बरोबर दिवसातुन ते चार वेळा फोन करत आई वडीलांची विचारपुस करत होते़ अशी माहिती पोलीसांनी दिली.

--------------------------------आपल्या आईचा मृत्यू झाला आहे हे मुलांना कळताच त्यांना धक्का बसला. ते कसेबसे करून सोलापूर येण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. पोलीसांची परवानगी मिळाली. पण येताना प्रत्येक ठिकाणी त्यांची विचारपुस होत होती़ सोलापुरात आल्यानंतर त्यांची कोरोना बाबतची तपासणी करण्यात आली. आणि त्यांना घरी सोडण्यात आले. सोलापूरात दाखल होईपर्यंत ४ ठिकाणी त्यांना तपासणी करण्यात आले.

-------------------------------घडलेली घटना पोलीसांना सांगितले, त्यामुळे पोलीस प्रशासनाचा ही मदत झाली. पण सोलापूरला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे मला आईच्या अंत्यविधी मिळाली नाही. वडीलांना धक्का बसेल म्हणून अजूनही वडीलांना आई गेल्याचे सांगितले नाही.मयताचा मुलगा

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू