शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

कला शाखेत सर्वांना प्रवेश, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी मात्र प्रवेश परीक्षा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 14:41 IST

तज्ज्ञांचे मत : ज्या महाविद्यालयांनी सराव परीक्षा घेतल्या नाहीत त्यांची होणार अडचण

सोलापूर : आत्तापर्यंतच्या प्रवेशाच्या अनुभवानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यानुसार तेथे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेसाठी जास्त आहे, त्यानुसार महाविद्यालय स्तरावर सामायिक परीक्षा घ्यावी. कला शाखेच्या अनेक ठिकाणी जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट प्रवेश द्यावा. विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी जास्त गर्दी होत असल्यामुळे त्यासाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घ्यावी लागणार आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता प्रशासनाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे या निर्णयाचे अनेक शिक्षक तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. तर अनेकजण याचा विरोध करत आहेत. दरम्यान, परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी सीईटी घेणे हा एक मार्ग आहे. सीईटी महाविद्यालयीन स्तरावर असणार आहे का जिल्ह्यानुसार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

जर महाविद्यालय स्तरावर सामायिक परीक्षा द्यावी लागली तर एका विद्यार्थ्यास अनेक महाविद्यालयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. महाविद्यालयातून सीईटीच्या परीक्षेत शुल्कपोटी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सीईटी घेताना शिक्षण विभागाचे किंवा प्रशासनाचे त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

टॉपर विद्यार्थ्यांची जेईई किंवा नीटसाठी तयारी

कला शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शक्यतो अडचणी येणार नाहीत. वाणिज्य शाखेत काही ठराविक महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होते आणि टॉपर विद्यार्थी जेईई किंवा नीटसाठी तयारी करतात आणि उर्वरित प्रश्न राहिला तो विज्ञान शाखेकडे, त्या शाखेत प्रवेश घेताना महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे. गरज वाटल्यास प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना त्यावर नियंत्रणास सांगितल्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

- हनुमंत जगताप, शिक्षण तज्ज्ञ

 

जे विद्यार्थी सराव परीक्षा किंवा पूर्व परीक्षांचे मार्क गृहीत धरले जात नाही, या विचाराने परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची टक्केवारी कमी होऊ शकते. सोबतच ज्या शाळांमध्ये परीक्षा झाल्या नाहीत किंवा परीक्षेत विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्यांच्याही मार्कांवर परिणाम होऊ शकतो.

- हनुमंत जामदार, शिक्षण तज्ज्ञ

बारावीच्या निकालाबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत. हा निर्णय देशपातळीवरचा असून बारावीवरच जेईई आणि नीटची सामायिक परीक्षा घेतली जाते. यामुळे शासनाचे आदेश आल्यानंतरच प्रवेशाची दिशा स्पष्ट होईल.

- व्ही. पी. उबाळे, प्राचार्य,

दयानंद महाविद्यालय,सोलापूर

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. त्या परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा परिणाम होणार आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी कोणत्या पात्रतेनुसार प्रवेश मिळेल याबाबतच्या सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. पण भविष्यातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून शासनाने परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- डॉ. एम. डी. गायकवाड,

प्राचार्य वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर

बारावीनंतरची संधी

बारावीनंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना ५ वर्षांचा लॉ पदवी कोर्स करता येऊ शकतो. अभियांत्रिकीमध्ये पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम करता येतो, संरक्षण दलातील करिअर, लघु उद्योगक्षेत्रातील करिअर, फाईन आर्ट्स, बीसीए (बीबीए कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स), बीबीए, मनोरंजन क्षेत्रातील करिअर, संशोधन क्षेत्रातील करिअर, हॉटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही आदी विषयात बारावीच्या मुलांना करिअर करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कुवतीप्रमाणे योग्य त्या क्षेत्रात करिअर करावे, त्याप्रमाणेच शिक्षण घ्यावे असेही शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षाGovernmentसरकार