शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

अक्कलकोटमधील बागायतदारांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 3:19 PM

अतिवृष्टीचा फटका; अक्कलकोट तालुक्यात ५०० हेक्टरवर फळपिकांचे नुकसान

ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळद्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतातफवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : मागील १५ दिवसांपासून सतत होणाºया पावसामुळे तालुक्यातील फळपिके आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ दुष्काळसदृश स्थितीत पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जगविली़ आज अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे़ तालुक्यात ५०० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ या नैसर्गिक संकटाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.

द्राक्ष म्हटलं की सर्वप्रकारच्या पिकांमधील नाजूक फळपीक. या पिकाकडे सर्वसामान्य शेतकरी शक्यतो वळत नाही. कारण खर्चिक पीक म्हणून याकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात शासनाकडून फळपिकांबाबत शेतकºयांना प्रोत्साहन मिळाल्याने द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली़ एखादे वर्ष वगळता अचानक रोगराई पसरण्याचे प्रकार घडत आहेत़ मात्र औषध फवारणी केल्याबरोबर तत्काळ सुधारणा होत असे. यंदा मात्र नेमके सर्वकाही उलटं होत आहे.

दरवर्षी औषधाच्या खर्चात तिपटीने वाढ होत आहे़ २४ सप्टेंबरपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही़ द्राक्षाच्या काडीची वाढ व्यवस्थित झाली नाही. एकंदरीत द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, लिंबू यासह वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, बटाटे अशाप्रकारे ५०० हेक्टरवरील बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

आता मजुरांचा तुटवडा - गतवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागा जगवताना बागायतदारांना नाकीनऊ आले होते. दरम्यान, पावसाळ्यात पाऊस झाला नाही़ १० आॅक्टोबर २०१९ पूर्वी छाटणी केलेल्या बागावर दावणी, करपा यासारख्या रोगांचा प्रसार झाला आहे़ यामुळे हातातून बागा जाण्याच्या भीतीने महागडी औषध फवारणी केली आहे तसेच ज्यांनी १६ व १७ आॅक्टोबरदरम्यान बागांची छाटणी केली आहे त्यांच्या बागेवर मोठ्या प्रमाणात दावणी, करपा रोग फैलावला आहे. रोग पसरल्यानंतर तत्काळ आटोक्यात आणावे लागते. त्यासाठी मजुरांची फार मोठी गरज भासते. नेमके ते मिळत नाहीत. कमतरतेमुळे वेळेवर कामे होत नाहीत़ याचाही फटका शेतकºयांना बसला आहे.

फवारणीदेखील वाया...- रोज सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्रभर द्राक्षाची पाने ओलसरपणा धरतात़ त्यात भर म्हणून सकाळी दव व धुके पडत आहेत़ द्राक्षावर मारण्यात आलेल्या औषधांचा फारसा परिणाम झालेला नाही़ फवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे़ 

तडवळ, नागणसूर, जेऊर भागात सर्वाधिक बागायती- अक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळ आहे. अनेक वेळा मजुरांअभावी कामे वेळेत होत नाहीत. द्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतात़ यंदा मात्र मजूर मिळत नाहीत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसakkalkot-acअक्कलकोट