शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

गोवर-रुबेला लसीमुळे एकाचाही मृत्यू नाही; जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:56 IST

सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज ...

ठळक मुद्देभारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिलीसोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेतभारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले

सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेत. त्या अफवांवर मुस्लिम बांधवांनी विश्वास ठेवू नये, गोवर-रुबेला लसीमुळे आजवर एकाही बालकाचा  मृत्यू झाला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी स्पष्ट केले. या लसीमुळे ना मर्द व नपुंसकता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

रुबेला लसीकरणाबाबत मुस्लीम समाज व डॉक्टरांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉक्टर उपस्थित होते.

शाळेत लस देणाºयांना तो मुलगा व मुलगी कोणत्या समाजाचा आहे हे माहिती नसते. हे मनातून काढून टाका, रुबेला लसीमुळे मुस्लीम समाजाला नामर्द, नपुंसकता असे गैरसमज पसरविले जात आहेत. शहरातील सर्वच शाळेत मुलांना लस देण्याचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम शाळेत हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरवत आहेत आणि आमचे मुस्लीम बांधव ते व्हिडिओ बघून मुलांना लस देण्याचे टाळत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोवर-रुबेला लसीमुळे कोणताही आजार होत नसल्याचे विविध पुरावे डॉ. सय्यद यांनी दाखविले. 

मुलांना आजार असल्यास सांगा- आपल्या मुलांना कोणता आजार किंवा इतर त्रास असल्यास लस देण्यापूर्वी पालकांनी त्याची कल्पना शिक्षकांना द्यावी. शिक्षक हे डॉक्टरला सांगतील. त्या प्रकारे त्याच्यावर उपचार केले जातील, असे डॉ. सय्यद म्हणाले. तसेच मुस्लीम बांधवांनी या लसची जनजागृती करुन सर्वांना लस द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

स्वतंत्र कक्ष सुरु- लसीकरणानंतर काही बालकामध्ये ताप येणे, चक्कर येणे, डोके दुखणे अशा प्रकारच्या तक्रारी आढळून येऊ शकतात. त्यासाठी लसीकरण  करणाºया आरोग्य सेविकांकडे आवश्यक औषधे व इंजेक्शन उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्याचप्रमाणे डॉ.व्ही.एम. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल येथे सदर बालकासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

गोवर लसीचे फायदे- बालकाला गोबर लस दिल्यास त्याचे आजारापासून संरक्षण होते. समाजामध्ये गोवर व रुबेला लस एकाचवेळी ठराविक वयोगटाला दिल्यास त्याचा सर्व समाजाला फायदा होणार आहे. सदृढ व सक्षम पिढी घडविण्यास मदत होते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले आहे. ही लस भारतातील कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी लस तयार होते, तेथे मुस्लीम समाजातील डॉक्टरांनी भेट देऊन प्रत्यक्ष खात्री केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल