शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गोवर-रुबेला लसीमुळे एकाचाही मृत्यू नाही; जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:56 IST

सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज ...

ठळक मुद्देभारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिलीसोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेतभारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले

सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेत. त्या अफवांवर मुस्लिम बांधवांनी विश्वास ठेवू नये, गोवर-रुबेला लसीमुळे आजवर एकाही बालकाचा  मृत्यू झाला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी स्पष्ट केले. या लसीमुळे ना मर्द व नपुंसकता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

रुबेला लसीकरणाबाबत मुस्लीम समाज व डॉक्टरांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉक्टर उपस्थित होते.

शाळेत लस देणाºयांना तो मुलगा व मुलगी कोणत्या समाजाचा आहे हे माहिती नसते. हे मनातून काढून टाका, रुबेला लसीमुळे मुस्लीम समाजाला नामर्द, नपुंसकता असे गैरसमज पसरविले जात आहेत. शहरातील सर्वच शाळेत मुलांना लस देण्याचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम शाळेत हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरवत आहेत आणि आमचे मुस्लीम बांधव ते व्हिडिओ बघून मुलांना लस देण्याचे टाळत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोवर-रुबेला लसीमुळे कोणताही आजार होत नसल्याचे विविध पुरावे डॉ. सय्यद यांनी दाखविले. 

मुलांना आजार असल्यास सांगा- आपल्या मुलांना कोणता आजार किंवा इतर त्रास असल्यास लस देण्यापूर्वी पालकांनी त्याची कल्पना शिक्षकांना द्यावी. शिक्षक हे डॉक्टरला सांगतील. त्या प्रकारे त्याच्यावर उपचार केले जातील, असे डॉ. सय्यद म्हणाले. तसेच मुस्लीम बांधवांनी या लसची जनजागृती करुन सर्वांना लस द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

स्वतंत्र कक्ष सुरु- लसीकरणानंतर काही बालकामध्ये ताप येणे, चक्कर येणे, डोके दुखणे अशा प्रकारच्या तक्रारी आढळून येऊ शकतात. त्यासाठी लसीकरण  करणाºया आरोग्य सेविकांकडे आवश्यक औषधे व इंजेक्शन उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्याचप्रमाणे डॉ.व्ही.एम. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल येथे सदर बालकासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

गोवर लसीचे फायदे- बालकाला गोबर लस दिल्यास त्याचे आजारापासून संरक्षण होते. समाजामध्ये गोवर व रुबेला लस एकाचवेळी ठराविक वयोगटाला दिल्यास त्याचा सर्व समाजाला फायदा होणार आहे. सदृढ व सक्षम पिढी घडविण्यास मदत होते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले आहे. ही लस भारतातील कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी लस तयार होते, तेथे मुस्लीम समाजातील डॉक्टरांनी भेट देऊन प्रत्यक्ष खात्री केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल