शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

Good News; रब्बी हंगाम व पाणीपुरवठ्यासाठी कुरनूर धरणातुन सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 1:11 PM

चपळगाव -  अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या कुरनूर धरणातुन मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. यामुळे अक्कलकोट , मैंदर्गी,दुधनी नगरपालिकेसह ...

चपळगाव - अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या कुरनूर धरणातुन मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी,दुधनी नगरपालिकेसह नदीकाठच्या गावांचा भर उन्हाळ्यात पाणीप्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.

 मागील आठवड्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी,संबधित विभागाचे अधिकारी आणि  पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत  झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणार्‍या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी  पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबधीत विभागाने मंगळवारी  सकाळी  पाणी सोडण्याची कार्यवाही केली. यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातुन ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात केवळ ८५ टक्के पाणीसाठा आहे.धरणात सद्यस्थितीत ६९९ दशलक्ष धनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. प्रत्येक दरविजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. सोडलेले पाणी खालच्या अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद,निमगाव, सातनदुधनी, रूद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात  साठवले जाणार आहे.

     ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न तुर्तास मिटला आहे. यामुळे रब्बी पिकांना फायदा होण्यास मदत होईल.बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,शाखा अभियंता रोहित मनलोर,कालवा निरीक्षक प्रशांत लोंढे,माजी बिटधारक एन.व्ही.उदंडे,राहूल काळे,स्वामी रोट्टे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीakkalkot-acअक्कलकोटagricultureशेतीFarmerशेतकरी