शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:22 IST

कुर्डूवाडीत काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण; विविध विकासकामांचा शुभारंभ

ठळक मुद्देबळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे - खा. शरद पवारशेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही - खा. शरद पवार

कुर्डूवाडी : राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. राज्यातील उद्योजक, कारखानदार अशा धनदांडग्यांची बँकांकडे असणारी ८५ हजार कोटींची थकबाकी भरण्याची तयारी दर्शविणाºया या सरकारला मात्र शेतकºयांचा विसर पडला आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, खासदार शरद पवार यांनी केली. 

येथील के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि विविध विकासकामांचा शुभारंभ मंगळवारी सकाळी खा. शरद पवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कारही करण्यात आला. 

खा. शरद पवार म्हणाले, बळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे. शेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही. शेतात राबणाºया शेतकºयांच्या दामाला दाम मिळत नाही. ती मिळवून घेण्याची ताकद तुमच्या- आमच्यामध्ये आहे.

शेतकºयांनी एकत्र येऊन जागरुक बनले तर मी तुम्हाला शब्द देतो की सध्याच्या केंद्र आणि राज्यातील राजकारण बदलल्याशिवाय गप्प बसणार नाही. समाजकारणात असताना आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. योग्य निर्णय घेतले नाही तर त्याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील, असे सांगत शरद पवार यांनी स्व. के. एन. भिसे यांच्या आठवणींना उजाळा देत विनायकराव पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. माढा तालुक्यात नेतृत्व करण्याची शक्ती आहे. स्व. गणपतराव साठे, स्व. भाई एस. एम. पाटील यांनी नेतृत्व केले. आता ती धुरा आमदार बबनराव शिंदे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे हे सांभाळत आहेत. आता आम्ही नवीन पिढीसाठी जागा मोकळ्या केल्या पाहिजेत़ त्या पद्धतीचे चित्र तयार करुन नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागेल. 

 प्रारंभी आमदार बबनराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांनी मानपत्राचे वाचन केले. ‘जीवन प्रवाह’ या स्मरणिकेचे प्रकाशनही खा. पवार यांच्या हस्ते झाले. आ. दिलीप सोपल, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या भाषणात विनायकराव पाटील यांच्यासोबतचे अनुभव सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी माजी खा. पद्मसिंह पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.भारत भालके, आ.दत्तात्रय सावंत, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे, माजी आ. राजन पाटील, दीपक साळुंखे, जयवंतराव जगताप, रश्मी बागल, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, रामदास महाराज, बळीराम साठे, पं. स.चे सभापती विक्रमसिंह शिंदे, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, माढा वेल्फेअरचे धनराज शिंदे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, रिपाइंचे बापूसाहेब जगताप, भोसरेचे सरपंच अ‍ॅड. धनाजी बागल, वामन उबाळे, सुरेश बागल, बार्शी शिवाजी शिक्षण मंडळाचे डॉ. बी. वाय. यादव, जयंत पाटील, अर्जुनराव बागल, संजय गोरे, विश्वासराव कचरे, भीमानगरचे संजय पाटील, रमेश पाटील, डॉ. शशिकांत त्रिंबके आदी उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. आर. आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव बाळासाहेब भिसे, विश्वनाथ ठोकडे, मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, औदुंबर पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, सुधीर कौलगे, जयश्री भिसे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस