शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:22 IST

कुर्डूवाडीत काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण; विविध विकासकामांचा शुभारंभ

ठळक मुद्देबळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे - खा. शरद पवारशेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही - खा. शरद पवार

कुर्डूवाडी : राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. राज्यातील उद्योजक, कारखानदार अशा धनदांडग्यांची बँकांकडे असणारी ८५ हजार कोटींची थकबाकी भरण्याची तयारी दर्शविणाºया या सरकारला मात्र शेतकºयांचा विसर पडला आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, खासदार शरद पवार यांनी केली. 

येथील के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि विविध विकासकामांचा शुभारंभ मंगळवारी सकाळी खा. शरद पवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कारही करण्यात आला. 

खा. शरद पवार म्हणाले, बळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे. शेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही. शेतात राबणाºया शेतकºयांच्या दामाला दाम मिळत नाही. ती मिळवून घेण्याची ताकद तुमच्या- आमच्यामध्ये आहे.

शेतकºयांनी एकत्र येऊन जागरुक बनले तर मी तुम्हाला शब्द देतो की सध्याच्या केंद्र आणि राज्यातील राजकारण बदलल्याशिवाय गप्प बसणार नाही. समाजकारणात असताना आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. योग्य निर्णय घेतले नाही तर त्याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील, असे सांगत शरद पवार यांनी स्व. के. एन. भिसे यांच्या आठवणींना उजाळा देत विनायकराव पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. माढा तालुक्यात नेतृत्व करण्याची शक्ती आहे. स्व. गणपतराव साठे, स्व. भाई एस. एम. पाटील यांनी नेतृत्व केले. आता ती धुरा आमदार बबनराव शिंदे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे हे सांभाळत आहेत. आता आम्ही नवीन पिढीसाठी जागा मोकळ्या केल्या पाहिजेत़ त्या पद्धतीचे चित्र तयार करुन नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागेल. 

 प्रारंभी आमदार बबनराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांनी मानपत्राचे वाचन केले. ‘जीवन प्रवाह’ या स्मरणिकेचे प्रकाशनही खा. पवार यांच्या हस्ते झाले. आ. दिलीप सोपल, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या भाषणात विनायकराव पाटील यांच्यासोबतचे अनुभव सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी माजी खा. पद्मसिंह पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.भारत भालके, आ.दत्तात्रय सावंत, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे, माजी आ. राजन पाटील, दीपक साळुंखे, जयवंतराव जगताप, रश्मी बागल, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, रामदास महाराज, बळीराम साठे, पं. स.चे सभापती विक्रमसिंह शिंदे, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, माढा वेल्फेअरचे धनराज शिंदे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, रिपाइंचे बापूसाहेब जगताप, भोसरेचे सरपंच अ‍ॅड. धनाजी बागल, वामन उबाळे, सुरेश बागल, बार्शी शिवाजी शिक्षण मंडळाचे डॉ. बी. वाय. यादव, जयंत पाटील, अर्जुनराव बागल, संजय गोरे, विश्वासराव कचरे, भीमानगरचे संजय पाटील, रमेश पाटील, डॉ. शशिकांत त्रिंबके आदी उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. आर. आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव बाळासाहेब भिसे, विश्वनाथ ठोकडे, मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, औदुंबर पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, सुधीर कौलगे, जयश्री भिसे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस