शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पाच महिन्यांपूर्वी भरलेले उजनी धरण झाले मायनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 2:20 PM

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग ...

ठळक मुद्देसध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे.

सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा असून, बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल, उपयुक्त पाणीसाठा ४९१ दशलक्ष घनमीटरवर येईल त्या वेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल. सध्या ९० क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी, २८० क्युसेक सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी, ३२०० क्युसेक इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे. येणाºया काळात नदीला पाणी सोडावे लागणार आहे. म्हणजेच पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीतच निवडणुकीचे वातावरण तापले असताना पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांना झगडावे लागणार आहे.

गेल्या वर्षी १२ मार्चला उजनी धरणात पाणीसाठा ७१.८१ टक्के एवढा होता. आजच्या दिवशी यावर्षी उजनी पाणीसाठा ३.८३ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा २.५५ टीएमसी इतका आहे. चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली परंतु पुणे जिल्ह्यातील पडलेल्या पावसामुळे उजनीवरील धरणे भरली आणि तिथून विसर्ग उजनीत सोडला गेला. त्याचा फायदा उजनी धरणाला झाला. सुरुवातीला पाणी नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे उजनी धरण झपाट्याने रिकामे झाले आहे. रोज एक टक्का पाणीसाठा उजनी धरणातील कमी होत असून, येत्या दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल.

उजनीची सद्यस्थिती

  • - एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर
  • - एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी
  • - टक्केवारी ३.८३ %
  • - एकूण टीएमसी ६५.७१
  • - उपयुक्त टीएमसी २.०५

विसर्ग

  • - कालवा ३२०० क्युसेक
  •  - बोगदा ६९० क्युसेक
  • - सीना-माढा उपसा सिंचन २८० क्युसेक
  • - दहिगाव उपसा सिंचन ९० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdroughtदुष्काळ