शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

माचणूरच्या सरपंचाचे धाडस; भीमा नदी पात्रात बुडणाºया चौघांना मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:08 IST

भीमा नदीत बुडणाºया चौघांना जीवदान; माचणूरचे सरपंच सुनील पाटलांनी केलं धाडस

ठळक मुद्देमाचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होतेसुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेचौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़

मंगळवेढा : तालुक्यातील माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासोबत भीमा नदीत मासे आलेत का हे पाहण्यासाठी गेले़ ते दोघे नदीच्या माचणूरकडील बाजूने जात असताना मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे शब्द कानी पडले़ चार तरूण दुथडी भरलेल्या नदीपात्राच्या प्रवाहात बुडत असल्याचे त्यांना दिसले़ त्यांनी कशाचाही विचार न करता एकेक करीत त्या चौघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़रविवारी दुपारी चार दुचाकीवरून आठ तरूण पोहण्यासाठी अर्धनारीजवळील बंधाºयाजवळ गेले़ त्यांनी भीमा नदीच्या तीरावर दुचाकी लावून पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले़ दरम्यान, चौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़ तेव्हा मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे ओरडू लागले.

दरम्यान, माचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होते़ त्यांना त्या तरुणांचा आवाज कानी पडला़ सुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़ स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पोहत जाऊन पाण्याच्या प्रवाहातून त्या चौघांना बाहेर काढले़ त्यांच्या पोटातून पाणी काढले़ ते शुद्धीवर आल्यानंतर माझ्या पाया पडू लागले, पण मी त्यांना असे करू नका, जीव वाचला हेच महत्त्वाचे आहे, असे सांगून शांत केले. त्यानंतर वेगवान पाण्याच्या प्रवाहात जास्त पोहल्यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता़ हात आणि पाय दुखत असल्याने त्या ठिकाणी न थांबता मी थेट घरी येऊन झोपी गेलो ते सोमवारी सकाळी ८ वाजताच उठलो. ते तरुण कुठले होते, कशासाठी आले होते, याची काहीही माहिती मी जाणून घेतली नाही. केवळ त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते, ते काम मी केल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले.

आतापर्यंत १०० जणांना वाचविले- गावच्या शेजारीच नदी असल्याने पाचवीला असताना पोहायला शिकलो़ त्यानंतर पाण्यात कोण बुडत असल्याचे दिसताच त्यांचा जीव वाचविण्याचे काम केले़ आतापर्यंत सुमारे १०० पेक्षा जास्त व्यक्तींना वाचविले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीriverनदी