शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

माचणूरच्या सरपंचाचे धाडस; भीमा नदी पात्रात बुडणाºया चौघांना मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:08 IST

भीमा नदीत बुडणाºया चौघांना जीवदान; माचणूरचे सरपंच सुनील पाटलांनी केलं धाडस

ठळक मुद्देमाचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होतेसुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेचौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़

मंगळवेढा : तालुक्यातील माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासोबत भीमा नदीत मासे आलेत का हे पाहण्यासाठी गेले़ ते दोघे नदीच्या माचणूरकडील बाजूने जात असताना मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे शब्द कानी पडले़ चार तरूण दुथडी भरलेल्या नदीपात्राच्या प्रवाहात बुडत असल्याचे त्यांना दिसले़ त्यांनी कशाचाही विचार न करता एकेक करीत त्या चौघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़रविवारी दुपारी चार दुचाकीवरून आठ तरूण पोहण्यासाठी अर्धनारीजवळील बंधाºयाजवळ गेले़ त्यांनी भीमा नदीच्या तीरावर दुचाकी लावून पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले़ दरम्यान, चौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़ तेव्हा मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे ओरडू लागले.

दरम्यान, माचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होते़ त्यांना त्या तरुणांचा आवाज कानी पडला़ सुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़ स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पोहत जाऊन पाण्याच्या प्रवाहातून त्या चौघांना बाहेर काढले़ त्यांच्या पोटातून पाणी काढले़ ते शुद्धीवर आल्यानंतर माझ्या पाया पडू लागले, पण मी त्यांना असे करू नका, जीव वाचला हेच महत्त्वाचे आहे, असे सांगून शांत केले. त्यानंतर वेगवान पाण्याच्या प्रवाहात जास्त पोहल्यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता़ हात आणि पाय दुखत असल्याने त्या ठिकाणी न थांबता मी थेट घरी येऊन झोपी गेलो ते सोमवारी सकाळी ८ वाजताच उठलो. ते तरुण कुठले होते, कशासाठी आले होते, याची काहीही माहिती मी जाणून घेतली नाही. केवळ त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते, ते काम मी केल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले.

आतापर्यंत १०० जणांना वाचविले- गावच्या शेजारीच नदी असल्याने पाचवीला असताना पोहायला शिकलो़ त्यानंतर पाण्यात कोण बुडत असल्याचे दिसताच त्यांचा जीव वाचविण्याचे काम केले़ आतापर्यंत सुमारे १०० पेक्षा जास्त व्यक्तींना वाचविले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीriverनदी