शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, दुष्काळाच्या छायेतील बार्शीकरांना 'असा' आधार दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 17:57 IST

राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील

सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्दाचे पक्के आहेत, असे राजकीय वर्तुळात नेहमीच बोलले जाते. मात्र, बार्शीकरांना याचा प्रत्यय आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत 250 महसूल मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शीकरांना दिलेला शब्द पाळला आहे. 

राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, या दोन्ही यादीतून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला वगळण्यात आले होते. त्यामुळे बार्शीकर नाराज झाले होते, तसेच दुष्काळ यादीत बार्शीचा समावेश व्हावा यासाठी बार्शीकरांकडून आंदोलन अन् निवेदनही देण्यात येत होते. पण, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणखी 250 महसूल मंडलाचा दुष्काळ यादीत समावेश केला आहे. ज्या मंडलात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला, त्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या बार्शी आणि उत्तर सोलापूरला स्थान मिळाले आहे. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 मंडलांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळल्यामुळे 'निसर्गानं झोडपलं पण राजानं तारलं' असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1, ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही. दरम्यान, बुधवारी बार्शी शहर वगळता, तालुक्यातील 9 मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळDilip Sopalदिलीप सोपलSolapurसोलापूर