शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रक म्हणजे फसवणूक

By admin | Updated: July 8, 2014 01:05 IST

पाटील यांचा आरोप :एकीकडे तूट तर दुसरीकडे शिल्लक

सोलापूर : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत मंगळवारी अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. यामध्ये पालिका प्रशासनाकडून एकूण अंदाजपत्रकात ६६ कोटी ४८ लाख ९२ हजार ७८८ रुपयांची तूट दाखवली जात असताना दुसरीकडे आरंभी शिल्लक ४ लाख २२ हजार १३ रुपये दर्शविले जात आहेत. त्यामुळे हे अंदाजपत्रक म्हणजे सोलापूरकरांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पालिका प्रशासनाने २0१३-१४ आणि नियमित २0१४-१५ या सालातील अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ दाखवली आहे. सुधारित अंदाजपत्रकात आयुक्तांनी २८५ कोटी २२ लाख १८ हजारांची आकडेवारी दिली आहे. प्रत्यक्षात २१८ कोटी ७३ लाख २५ हजार २१२ रुपयांचे उत्पन्न दाखवून त्यात ६६ कोटी ४८ लाख ९२ हजार ७८८ रुपयांचे उत्पन्न कमी असल्याचे दाखवत तुटीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यात वाढ करून सत्ताधाऱ्यांनी ४१२ कोटी १९ लाख १८ हजारांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. २0१२-१३ साली १९३ कोटी ४५ लाख ९२ हजार ७८८ रुपयांचे उत्पन्न कमी होते. असे असताना ११५ कोटी भांडवली कामाचा तक्ता जोडण्यात आला आहे. एकीकडे तुटीचे अंदाजपत्रक मांडण्यात आले असताना यामध्येच ४ लाख २२ हजार १३ रुपयांचा आरंभी शिल्लक दाखवण्यात आला आहे. तुटीचे अंदाजपत्रक मांडत असताना शिल्लक कशी दाखवता येते, असा प्रश्न करीत सुरेश पाटील यांनी सोलापूरकरांची फसवणूक केली जात असल्याचे सांगितले. २0१३-२0१४ च्या अंदाजपत्रकात ३५४ कोटी ८९ लाख २३ हजार इतकी आकडेवारी दाखवली आहे. प्रत्यक्षात ३0४ कोटी ३५ लाख ७३ हजार ६११ रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. यामध्ये ५0 कोटी ५३ लाख ४९ हजार ३८९ रुपयांची तूट दाखवण्यात आली आहे. सुधारितमध्ये ४१३ कोटी ५२ लाख ८८ हजारांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. त्यात १0९ कोटी १७ लाख १३ हजार ३८९ रुपयांची तूट आहे. २0११-१२, २0१२-१३ आणि २0१३-१४ या तीन वर्षांच्या कालावधीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात २३३ कोटी ५ लाख ९७ हजार ९३९ रुपयांचे उत्पन्न कमी आले आहे. मनपा प्रशासनापेक्षा ५३५ कोटी ८१ लाख ३५ हजार ९३९ रुपये कमी अंदाजपत्रक आले आहे. सुधारित अंदाजपत्रकात २८१ कोटी २ लाख ९१ हजार ९३९ रुपये कमी दाखवण्यात आल्याचेही सुरेश पाटील यांनी सांगितले. -------------------------एक नजरगेल्या दहा वर्षात एकही नोकरभरती झाली नाही, अनेक लोक सेवानिवृत्त झाले आहेत, असे असताना व्यवस्थापनावरील खर्च कमी होणे अपेक्षित आहे, तो झाला नाही. दि. १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ मध्ये जेवढे उत्पन्न मिळते तितकाच खर्च झाला पाहिजे. शहरात एकूण ३ लाख स्थावर मालमत्ता असताना त्यातील १ लाख मालमत्ता बेकायदेशीर आहे. त्यांच्याकडून करवसुली केली जात नाही. महापालिकेत १ हजार ४९ पदे रिक्त झालेली असताना त्यांच्या व्यवस्थापनावरील खर्च आहे तसाच आहे. एकूण मालमत्तेच्या ७0 टक्के वसुली होणे अपेक्षित असून जमावबंदीमधून ८0 टक्के कर वसूल झाला पाहिजे, असा नियम आहे. असे झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास वेळ लागत नाही.