शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सावधान.. धुळकट अन् धुरकट वातावरणामुळे सोलापूरकरांची श्वसनलिका डेंजर झोनमध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:42 PM

गंभीर विकारांचा धोका : प्रदूषणात सोलापूरचा क्रमांक टॉप टेनमध्ये; उपसंचालक म्हणतात, कृती आराखडा पाठविला

ठळक मुद्देवाढत्या धुळीमुळे सोलापूर शहराची ओळख धुळीचे शहर म्हणून होत चाललीराज्यात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सोलापूर टॉप टेनमध्ये असल्याचा अहवालशहरातील वाहनांची संख्याही वाढली असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली

महेश कुलकर्णी सोलापूर : वाढत्या धुळीमुळे सोलापूर शहराची ओळख धुळीचे शहर म्हणून होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सोलापूर टॉप टेनमध्ये असल्याचा अहवाल प्रदूषण मंडळाचा आहे. शहरातील वाहनांची संख्याही वाढली असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. धूर आणि धुळीच्या मिश्रणामुळे सोलापूरकरांचा श्वास कोंडत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे जरी असले तरी हद्दवाढ भागात आजही अंतर्गत रस्ते कच्चे आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुलीकण असतात. होटगी गावाच्या परिसरात अनेक सिमेंट कंपन्या असल्यामुळे होटगी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ असते. यामुळे दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले तरी प्रशासनाकडून या प्रकाराची फारशी गंभीर दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. शिवाजी चौक, पार्क चौक, रंगभवन, आसरा, सात रस्ता, कन्ना चौक, टिळक चौक, सत्तर फूट रोड, होटगी रोड याठिकाणी धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.

हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १० शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे. वाढती धूळ, जाळलेला कचरा, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे दमा, श्वसन विकार आणि फुप्फुस विकारांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असून, त्यांना श्वसनाचे विकार जडत आहेत.शहरात जवळपास सहा लाखांच्या आसपास वाहने आहेत. या वाहनांमधून ८५ हजार लिटर डिझेल-पेट्रोलचा वापर होतो. यामुळे निर्माण होणारा धूर शहरातील किती लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत असेल हे सांगणे कठीण आहे. यामुळे सोलापूरकरांच्या श्वासात आॅक्सिजन जाते की धूर हेही सांगणे अवघड आहे. 

धुळीमुळे आरोग्यावर होणारे परिणाम...- धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. दवाखान्यात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कांबळे म्हणाले की, धूळ श्वासावाटे शरीरात जाते. धूलिकण फुफ्फुसात जमा होतात. अ‍ॅलर्जीचा त्रास असणाºयांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर सर्वसामान्यांना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धूलिकणांचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होणे, ब्राँकॉयटिस होणे. धूलिकण बराच काळ वातावरणात राहतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुफ्फुसात, श्वासनलिकेत जातात. जरी श्वास घेताना तो फिल्टर होऊन जात असला तरी सूक्ष्म घटक आतपर्यंत पोहोचतात. हे खूप धोकादायक आहेत. याचे दुष्परिणाम तत्कालिक आणि दीर्घकालीन आहेत.

आरएसपीएमचे प्रमाण वाढले- हवेचे प्रदूषण म्हणजे हवेतील धूलिकणांचे वाढलेले प्रमाण. शास्त्रीय भाषेत त्याला रेस्पायरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर अर्थात आरएसपीएम असे संबोधले जाते. प्रदूषणाच्या मानकानुसार आरएसपीएमचे प्रमाण २०० मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर असायला हवे. हे प्रमाण आता दुपटीवर गेले आहे. सण, उत्सवाच्या काळात हे प्रमाण तिपटीने वाढते.

सोलापूर शहर स्मार्ट होत असल्यामुळे महानगरपालिकेच्या सहकार्याने आम्ही हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शहर कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये वाहतूक, इंधन, कचरा, धूळ या सर्वच बाबींचा समावेश आहे. महिन्यापूर्वी हा आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. राज्याने तो केंद्राकडे पाठविला आहे. यावरच्या उपाययोजनांवर शासनाकडून लवकरच आदेश प्राप्त होतील.- नवनाथ आवताडे, उपसंचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळ

ब्लॅक कार्बन, धुळीचे कण ठरताहेत घातक - शहरांमधील वातावरणातील प्रदूषणाला कारणीभूत सल्फेट नायट्रेटस, कार्बन मोनोआॅक्साइड, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व मायक्रॉनचे पार्टिकल कण श्वसननलिकेमध्ये श्वासाद्वारे शरीरात शिरतात. त्यामुळे श्वसननलिका लालसर होते, आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे.

धुळीमुळे त्वचा आणि केस जाणे या दोन्हींच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. केस कोरडे होऊन तुटायला लागतात. हे टाळण्यासाठी हेल्मेट किंवा टोपी नेहमी वापरावी. यामुळे केस सुरक्षित राहतात. धुळीच्या पार्टिकल्समुळे चेहरा रखरखीत आणि कोरडा होतो. अशा वेळी जास्त साबण न लावता पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा चेहरा धुवावा.- डॉ. नितीन ढेपे, त्वचारोग तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरair pollutionवायू प्रदूषणenvironmentवातावरणHealthआरोग्य