शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

दुष्काळापासुन वंचित असलेल्या बार्शी, ‘उत्तर’ तालुक्याचा चेंडू  कृषी आयुक्तांकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:58 IST

जिल्हाधिकाºयांची माहिती: स्वतंत्र पथक पाठवून तपासणीची मागणी

ठळक मुद्दे यंदा जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के इतकाच पाऊसपुण्यात राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया

सोलापूर : बार्शी व उत्तर सोलापूर हे दोन्ही तालुके टंचाईस्थितीतून तांत्रिकदृष्ट्या वगळले असले तरी कृषी विभागाने स्वतंत्र पथक पाठवून तेथे पुन्हा एकदा पाहणी करावी, अशी आग्रही भूमिका राज्यस्तरीय दुष्काळ समितीच्या बैठकीत मांडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरूवारी दिली. त्यामुळे आता या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळासंबंधीचा निर्णय राज्यस्तरीय दुष्काळ समितीचे अध्यक्ष तथा कृषी आयुक्त यांच्या हाती आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या टंचाई अहवालावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील सत्यस्थिती मांडल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. इतर तालुक्यांप्रमाणेच उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. या दोन तालुक्यांतही पावसाअभावी ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

 यंदा जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के इतकाच पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाचीही आता आशा मावळली आहे. भविष्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने तयार केलेला अहवाल विभागीय आयुक्त व कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात उपग्रह सर्वेक्षणात पात्र ठरलेले अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ या ९ तालुक्यांबरोबरच वगळण्यात आलेल्या उत्तर सोलापूर आणि बार्शी या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला आहे. 

यापूर्वी शासनाच्या जीपीएस सिस्टिमद्वारे करण्यात आलेल्या पाहणीत उत्तर सोेलापूर आणि बार्शी तालुक्यात हिरवे क्षेत्र दिसत असल्याने या दोन्ही तालुक्यांना टंचाई स्थितीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या भागातील क्षेत्र हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्षात पिके हाती लागणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.  त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे दोन्ही तालुके वगळले असले तरी कृषी विभागाने पुन्हा एकदा पथक पाठवून उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्याची पाहणी करुन अंतिम निर्णय घ्यावा, अशी समितीपुढे मागणी केल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. त्यामुळे आता कृषी आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, यावर या दोन्ही तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. 

चाºयासाठी ३५ लाखच्जिल्ह्यातील संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेता नियोजन समितीतून चाºयासाठी ५0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातील ३५ लाख पशुसंवर्धन विभागाला वितरित केले आहेत. यातून आत्मा संस्थेमार्फत १५०० एकरांवर सुमारे ५० हजार टन चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून आठवडाभरात लाभार्थ्यांना बी-बियाणे व खते उपलब्ध करून दिली जातील. सध्या १४ लाख टन चारा उपलब्ध असून, तो मार्चपर्यंत पुरणार आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवेल, हे लक्षात घेऊन १५ हजार जलसाठे आरक्षित करण्याबाबत संंबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. मागणी असेल तेथे टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना दिल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती