शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दुष्काळापासुन वंचित असलेल्या बार्शी, ‘उत्तर’ तालुक्याचा चेंडू  कृषी आयुक्तांकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:58 IST

जिल्हाधिकाºयांची माहिती: स्वतंत्र पथक पाठवून तपासणीची मागणी

ठळक मुद्दे यंदा जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के इतकाच पाऊसपुण्यात राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया

सोलापूर : बार्शी व उत्तर सोलापूर हे दोन्ही तालुके टंचाईस्थितीतून तांत्रिकदृष्ट्या वगळले असले तरी कृषी विभागाने स्वतंत्र पथक पाठवून तेथे पुन्हा एकदा पाहणी करावी, अशी आग्रही भूमिका राज्यस्तरीय दुष्काळ समितीच्या बैठकीत मांडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरूवारी दिली. त्यामुळे आता या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळासंबंधीचा निर्णय राज्यस्तरीय दुष्काळ समितीचे अध्यक्ष तथा कृषी आयुक्त यांच्या हाती आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या टंचाई अहवालावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील सत्यस्थिती मांडल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. इतर तालुक्यांप्रमाणेच उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. या दोन तालुक्यांतही पावसाअभावी ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

 यंदा जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के इतकाच पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाचीही आता आशा मावळली आहे. भविष्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने तयार केलेला अहवाल विभागीय आयुक्त व कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात उपग्रह सर्वेक्षणात पात्र ठरलेले अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ या ९ तालुक्यांबरोबरच वगळण्यात आलेल्या उत्तर सोलापूर आणि बार्शी या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला आहे. 

यापूर्वी शासनाच्या जीपीएस सिस्टिमद्वारे करण्यात आलेल्या पाहणीत उत्तर सोेलापूर आणि बार्शी तालुक्यात हिरवे क्षेत्र दिसत असल्याने या दोन्ही तालुक्यांना टंचाई स्थितीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या भागातील क्षेत्र हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्षात पिके हाती लागणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.  त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे दोन्ही तालुके वगळले असले तरी कृषी विभागाने पुन्हा एकदा पथक पाठवून उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्याची पाहणी करुन अंतिम निर्णय घ्यावा, अशी समितीपुढे मागणी केल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. त्यामुळे आता कृषी आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, यावर या दोन्ही तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. 

चाºयासाठी ३५ लाखच्जिल्ह्यातील संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेता नियोजन समितीतून चाºयासाठी ५0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातील ३५ लाख पशुसंवर्धन विभागाला वितरित केले आहेत. यातून आत्मा संस्थेमार्फत १५०० एकरांवर सुमारे ५० हजार टन चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून आठवडाभरात लाभार्थ्यांना बी-बियाणे व खते उपलब्ध करून दिली जातील. सध्या १४ लाख टन चारा उपलब्ध असून, तो मार्चपर्यंत पुरणार आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवेल, हे लक्षात घेऊन १५ हजार जलसाठे आरक्षित करण्याबाबत संंबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. मागणी असेल तेथे टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना दिल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती